शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देवा गणराया, महापालिकेला माफ कर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:45 IST

शीतल पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दोन आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना, शहराच्या विविध भागात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करू, अशी ग्वाही खुद्द आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिली होती. पण वर्षभरात रस्त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. उलट रस्ते खड्ड्यांतच गेल्याने त्याचा त्रास ...

शीतल पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दोन आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना, शहराच्या विविध भागात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या मात्र वाढतच आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका हद्दीतील रस्ते चकाचक करू, अशी ग्वाही खुद्द आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिली होती. पण वर्षभरात रस्त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. उलट रस्ते खड्ड्यांतच गेल्याने त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुसरा गणेशोत्सव आला तरी खड्डे जैसे थेच आहेत. महापालिकेच्या या लाल फितीच्या कारभारामुळे ‘बाप्पा, महापालिकेला माफ कर’, असे म्हणण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे.सांगलीकरांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन यंदाही खड्ड्यांतूनच होणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीही गणरायाला खड्ड्यांतून आणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. अगदी ‘श्रीं’चे विसर्जनही खड्ड्यांतूनच झाले. खड्ड्यांचे विघ्न पुढीलवर्षी नसेल, असे महापालिकेच्या जबाबदार पदाधिकारी, अधिकाºयांनी अनेकदा सांगितले. पण परिस्थितीत बदल झाला नाही. गेल्यावर्षी सांगलीत चांगला पाऊस पडला. आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेताच पावसाने त्यांचे स्वागत केले. शामरावनगरसह अनेक उपनगरांत पाणी साचले. शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरांतील रस्ते खड्ड्यात गेले. नगरसेवकांनी मुरूमाची मागणी केली. पण आयुक्तांनी मुरूमात घोटाळा होतो, असे कारण देत पुढीलवर्षी पक्के रस्ते करू, असे सांगत नागरिकांची सहानुभूती मिळविली.पण वर्षभरात यातील कोणत्याच गोष्टी झाल्या नाही. अगदी पावसाच्या पहिल्याच दणक्यात पुन्हा उपनगरे चिखलात रुतली. कदाचित पावसालाच दया आल्याने, महिनाभर त्याने सांगलीकडे पाठ फिरविली आहे. खड्डेमुक्त शहराची घोषणा त्यावेळीही प्रशासनाने केली. महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यासारख्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी ढोल वाजून, खड्डे मुजविले जातील, पुढीलवर्षी चांगले रस्ते असतील, असे सांगून नागरिकांची बोळवण केली. पण त्यांची वक्तव्ये ‘बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ ठरली आहेत.वारंवार बैठका : फलित काय?आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून अनेक विभागांच्या बैठका घेतला. पण त्यांचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुजविण्याबाबत ५ आॅगस्ट रोजी बैठक होणार होती. पण काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली. वास्तविक खड्डे मुजविण्यासाठी बैठक घ्यावी लागते, हीच मुळात दुर्दैवी बाब आहे. आतापर्यंत ९० कोटीच्या फायली मंजूर केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. इतका निधी वर्षभरात खर्ची पडत असेल अथवा मंजुरी मिळत असेल, तर सांगलीची दुर्दशा का झाली?, याचे उत्तरही प्रशासनाने देणे क्रमप्राप्त आहे.खड्डे दिसूनही दुर्लक्षपहिल्याच पावसात शहरातील रस्ते खड्ड्यात गेले. त्यानंतर काही रस्त्यांवर पॅचवर्क झाले, पण तेही दुसºया पावसात वाहून गेले. खड्डे मुजविलेल्या रस्त्यांवरच खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अगदी महापालिकेच्या दारातून बाहेर पडताच तीनही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आयुक्त खेबूडकर यांचे निवासस्थान असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या रस्त्यावर तर खड्ड्यांची मोजदादच करता येत नाही. महापौरांपासून ते नगरसेवकांपर्यंत सारेच खड्ड्यांतून येतात. पण त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत. महापालिकेकडे चकरा मारताना अधिकारी, पदाधिकारी ज्या स्टेशन रोडवर येतात, तो रस्ताही खड्ड्यात गेला आहे. शंभरफुटी, संजयनगर, यशवंतनगर, चैतन्यनगर, चिन्मय पार्क, गावभाग अशा एक ना अनेक उपनगरांतील रस्त्यांवर खड्डे आहेत. जिल्हा सुधार समितीसारख्या काही सामाजिक संघटनांना खड्डेप्रश्नी आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाºयांना जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुर्दाड महापालिकेकडून आंदोलनापुरतेच खड्डे मुजविले जात आहेत. इतर ठिकाणी महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाºयांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. त्यामुळे यंदाही सांगलीकरांना गणरायाचे स्वागत खड्ड्यांतून करावे लागणार आहे. विघ्नहर्त्यामागील खड्ड्यांचे विघ्न कधी संपणार?, असा प्रश्नच गणेशभक्तांना पडला आहे.