शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा

By admin | Updated: March 7, 2015 00:00 IST

अनिल बाबर : नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी; भरपाईसाठी पाठपुरावा

विटा : खानापूर मतदारसंघात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागा, व रब्बी पिकांचे प्रशासनाने कार्यालयात बसून पंचनामे करू नयेत. अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश आ. अनिल बाबर यांनी दिले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खानापूर तालुक्यातील करंजे, पळशी, हिवरे, बलवडी (खा.) परिसरातील पिकांची पाहणी आ. बाबर यांनी केली. यावेळी त्यांनी ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, त्याप्रकारचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी व तलाठी यांना दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य पांडुरंग जाधव, राजाभाऊ शिंदे, पोपट माने, संभाजी जाधव, भानुदास सूर्यवंशी, अरविंद पाटील, दिनकर गायकवाड उपस्थित होते. बाबर यांनी परिसरातील द्राक्षबागांना भेटी दिल्या. नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सुचना केल्या.यावेळी माणिक जाधव, शहाजी सूर्यवंशी, पांडुरंग गायकवाड, अरविंद जाधव, धनंजय जोशी, भानुदास सूर्यवंशी, पोपट माने, खंडू माने, सुभाष गायकवाड, राजाराम जाधव, होनराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)