शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

साखरसम्राटांना सदाभाऊंची चपराक

By admin | Updated: March 21, 2017 23:43 IST

वाघवाडी कृषी महाविद्यालयास नाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सन्मान

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील यांनी निर्माण केलेल्या सर्वच सहकारी संस्थांना त्यांच्या राजकीय वारसदारांनी बापूंचे नाव दिले आहे. याउलट सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनी वाघवाडी येथे होणाऱ्या कृषी महाविद्यालयाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देऊन साखरसम्राटांना चपराक दिली आहे.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांच्या जिवावर राजकीय बस्तान बसवले आहे. त्यांनी साखर उद्योगाच्या साहाय्याने शैक्षणिक, वित्तीय आणि सहकारी संस्था निर्माण केल्या. मात्र या संस्थांना घरातील नेत्यांचेच नाव देण्याचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सर्वच सहकारी साखर कारखान्यांची नावे बदलण्याचा फंडा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. कारखान्याची सत्ता बदलली की कारखान्याचे नाव बदलण्याचे राजकारणही खेळले जात आहे. वाळवा तालुक्यातील राजारामबापू उद्योग समूहात हेच दिसते. राजारामबापू पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत वाळवा सहकारी साखर कारखाना, वाळवा सहकारी बँक, वाळवा सहकारी दूध संघाची स्थापना केली होती. कालांतराने सर्वच संस्थांचा विस्तार वाढत गेला. राजारामबापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक संस्थेला राजारामबापूंचे नाव देण्याचा सपाटा लावला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतले तरीही, सत्तेच्या जोरावर त्यांनी सर्व विरोध धुडकावून लावत हवे तेच केले.इस्लामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या इमारती, प्रकल्प, संकुलांना राजारामबापूंचेच नाव देण्यात आले आहे. नाट्यगृह नामकरणावेळी तर गदारोळ झाला. शिवसेनेने एका रात्रीत डिजिटल फलक लावून नाट्यगृहाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी अखेर नाट्यगृहाला राजारामबापूंचेच नाव दिले. पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामानंतर येथील वसंतदादा सभागृहाचे नाव बदलून राजारामबापूंचे नाव देण्यात आले. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परंतु येथे जयंत पाटील यांचाच विजय झाला. शासनाकडूनही राजारामबापूंचे नाव ठेवण्याचा निर्णय कायम झाला.क्रांतिसिंहांच्या विचारावर श्रध्दा आता राज्यातील साखरसम्राटांच्या मक्तेदारीला विरोध आणि जयंत पाटील यांना चपराक देण्यासाठीच वाघवाडी येथे होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालयाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव दिले आहे. सदाभाऊ यांची क्रांतिसिंहांच्या विचारांवर श्रद्धा आहे. या श्रद्धेची जपणूकच त्यांनी यातून केली आहे, अशी चर्चा सध्या वाळवा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे.