शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जागतिकीकरणामुळे समाजातील आर्थिक दरी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

सांगलीत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. ...

सांगलीत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. एच.एम. कदम, डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डी.जी. कणसे, प्रा. संजय ठिगळे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जागतिकीकरणामुळे समाजातील आर्थिक दरी वाढत चालली आहे. त्याविषयी समाजात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. सांगलीवाडी येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रा. संजय ठिगळे यांच्या ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील होते. विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच.एम. कदम, ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन आदी उपस्थित होते. ‘साहित्यविश्व’ या वेब पोर्टलचे अनावरण डॉ. साळुंखे यांच्या हस्ते या वेळी झाले.

डॉ. साळुंखे म्हणाले, वाढत्या आर्थिक दरीचे पुरेपूर विश्लेषण आणि जनजागृतीचे काम ‘अर्थभान’ पुस्तकाने केले आहे. या विषयावर तुलनेने कमी लेखन होते, ते वाढण्याची गरज आहे. शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र देशाला समृद्ध करते. त्याला चालना देणारे अभ्यासपूर्ण लिखाण व्हायला हवे.

डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीत कुटुंबांचे अर्थशास्त्र बिघडत चालले आहे. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत आहे. सुदृढ समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. आर्थिक विषयावर लेखन करणाऱ्याला आर्थिक व सामाजिक भान आणि समाजहिताचा दृष्टिकोनही असावा लागतो.

प्रा. महाजन म्हणाले, अर्थशास्त्र अधिक सोपे करण्याच्या प्रयत्नात त्यातील आत्मा हरपण्याची भीती असते. अर्थविषयक लेखकाने याचे भान ठेवायला हवे.

कार्यक्रमाला दादासाहेब ठिगळे, सुशीला ठिगळे, भाग्यश्री कासोटे- पाटील आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डी.जी. कणसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. आभार प्रा. तानाजी सावंत यांनी मानले.

--------------------