शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सांगली जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:43 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

ठळक मुद्दे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्वीकारला पुरस्कार केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने गुणांकनगुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर माहिती रोज अपलोड

सांगली , दि. ३ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पणअंतर्गत गुणांकन करण्यात येत आहे. त्यामध्ये जो जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त आहे, त्या जिल्ह्याने शौचालये किती बांधली, त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले आहे का?, शौचालयाचा वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाकडून किती जनजागृती झाली, शौचालय बांधकामाची किती छायाचित्रे आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर अपलोड केली आहेत.

प्रत्येक जिल्ह्याला काम होईल, तशी माहिती आॅनलाईन रोज भरावी लागत होती. या सर्व कामांचे मूल्यमापन करून स्वच्छता दर्पणमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया जिल्ह्यांचा दिल्लीत दि. २ आॅक्टोबर रोजी गौरव करण्यात आला. स्वच्छता दर्पण आॅनलाईन गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण त्यांनी मिळविले आहेत. सांगली जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधली आहेत. म्हणूनच सांगली जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर प्रथमपासून टिकून राहिला.

‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातत्य ठेवल्याप्रकरणी ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार देऊन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा सोमवारी केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस.अहलुवालिया यांच्याहस्ते गौरव केला.

अहलुवालिया यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरवही केला आहे. जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याच्या मोहिमेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि त्यांचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याच्या प्रतिक्रिया सरपंचांनी व्यक्त केल्या.