शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सांगली जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:43 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

ठळक मुद्दे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्वीकारला पुरस्कार केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने गुणांकनगुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर माहिती रोज अपलोड

सांगली , दि. ३ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पणअंतर्गत गुणांकन करण्यात येत आहे. त्यामध्ये जो जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त आहे, त्या जिल्ह्याने शौचालये किती बांधली, त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले आहे का?, शौचालयाचा वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाकडून किती जनजागृती झाली, शौचालय बांधकामाची किती छायाचित्रे आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर अपलोड केली आहेत.

प्रत्येक जिल्ह्याला काम होईल, तशी माहिती आॅनलाईन रोज भरावी लागत होती. या सर्व कामांचे मूल्यमापन करून स्वच्छता दर्पणमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया जिल्ह्यांचा दिल्लीत दि. २ आॅक्टोबर रोजी गौरव करण्यात आला. स्वच्छता दर्पण आॅनलाईन गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण त्यांनी मिळविले आहेत. सांगली जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधली आहेत. म्हणूनच सांगली जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर प्रथमपासून टिकून राहिला.

‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातत्य ठेवल्याप्रकरणी ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार देऊन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा सोमवारी केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस.अहलुवालिया यांच्याहस्ते गौरव केला.

अहलुवालिया यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरवही केला आहे. जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याच्या मोहिमेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि त्यांचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याच्या प्रतिक्रिया सरपंचांनी व्यक्त केल्या.