शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:43 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

ठळक मुद्दे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्वीकारला पुरस्कार केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने गुणांकनगुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर माहिती रोज अपलोड

सांगली , दि. ३ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने सांगली जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्याहस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पणअंतर्गत गुणांकन करण्यात येत आहे. त्यामध्ये जो जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त आहे, त्या जिल्ह्याने शौचालये किती बांधली, त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले आहे का?, शौचालयाचा वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाकडून किती जनजागृती झाली, शौचालय बांधकामाची किती छायाचित्रे आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर अपलोड केली आहेत.

प्रत्येक जिल्ह्याला काम होईल, तशी माहिती आॅनलाईन रोज भरावी लागत होती. या सर्व कामांचे मूल्यमापन करून स्वच्छता दर्पणमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया जिल्ह्यांचा दिल्लीत दि. २ आॅक्टोबर रोजी गौरव करण्यात आला. स्वच्छता दर्पण आॅनलाईन गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण त्यांनी मिळविले आहेत. सांगली जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये शंभर टक्के शौचालये बांधली आहेत. म्हणूनच सांगली जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर प्रथमपासून टिकून राहिला.

‘स्वच्छता दर्पण’मध्ये सातत्य ठेवल्याप्रकरणी ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार देऊन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचा सोमवारी केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री एस. एस.अहलुवालिया यांच्याहस्ते गौरव केला.

अहलुवालिया यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरवही केला आहे. जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याच्या मोहिमेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि त्यांचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याच्या प्रतिक्रिया सरपंचांनी व्यक्त केल्या.