शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांना आरक्षण अधिकार देणे मोठी चूक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

सांगली : राज्यांना जातींच्या आरक्षणाचा अधिकार देण्याचे केंद्र सरकारचे धोरण अत्यंत धोक्याचे असून ही मोठी चूक ठरेल. ही राज्ये ...

सांगली : राज्यांना जातींच्या आरक्षणाचा अधिकार देण्याचे केंद्र सरकारचे धोरण अत्यंत धोक्याचे असून ही मोठी चूक ठरेल. ही राज्ये पुन्हा केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहणार नसल्याने भाजपला या निर्णयाचा पश्चात्ताप करावा लागेल, असे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, आरक्षणाचा अधिकार हा केंद्र शासनाकडेच असायला हवा. अशा विधेयकातून चुकीच्या गोष्टी घडण्याचा धोका आहे. आरक्षणांचा विषय सुटण्याऐवजी तो अधिक जटिल होईल. राज्यांवरील केंद्र सरकारचे याबाबतीत कोणतेही नियंत्रण राहणार आहे. भविष्यात भाजपला या गोष्टींचा पश्चात्ताप करावा लागेल.

आधीच केंद्र सरकारने आरक्षणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. ओबीसींचे आरक्षण ३० वरून २७ टक्क्यांवर आणले आहे. आम्हाला ते पूर्ववत ३० टक्के हवे आहे. तेवढेच राजकीय आरक्षणही हवे आहे. ओबीसींच्या कोट्यात अन्य कोणालाही आरक्षण देऊ नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हे आरक्षण पूर्ववत करून द्यावे.

ओबीसीमधील समाविष्ट समाजाची जातवार जनगणना करण्यात यावी. ओबीसी उमेदवारांच्या आरक्षण कोट्याचा विचार करताना जे उमेदवार गुणवत्तेनुसार सर्वसाधारण कोट्यात बसतील त्यांना ओपनच समजावे. त्यांची गणना कोट्याच्या संख्येत करू नये. ओबीसी विद्यार्थ्यांकरिता जिल्हा व तालुकास्तरावर शासनाने वसतिगृहे बांधावीत. धनगर समाजाने पोट शाखेचा उल्लेख टाळून २९ शाखांनी त्यांची जात केवळ धनगर लावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चौकट

म्हणून पडळकर तसे म्हणत असतील...

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केंद्राचा नसून राज्याचा असल्याचे पडळकर सांगत असले तरी वास्तविक हा प्रश्न केंद्र सरकारच्याच अखत्यारितला आहे. राज्यात पक्षाला अनुकूल वातावरण म्हणून पडळकर तसे म्हणत असतील, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.

चौकट

राष्ट्रवादीने काय दखल घेतली?

डांगे म्हणाले की, राष्ट्रवादीत गेल्यानंतर मला पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाले. मात्र, त्या काळात मी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यानंतर पक्षाने माझी दखल घ्यायचे बंद केले.