शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

राज्यांना आरक्षण अधिकार देणे मोठी चूक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST

सांगली : राज्यांना जातींच्या आरक्षणाचा अधिकार देण्याचे केंद्र सरकारचे धोरण अत्यंत धोक्याचे असून ही मोठी चूक ठरेल. ही राज्ये ...

सांगली : राज्यांना जातींच्या आरक्षणाचा अधिकार देण्याचे केंद्र सरकारचे धोरण अत्यंत धोक्याचे असून ही मोठी चूक ठरेल. ही राज्ये पुन्हा केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहणार नसल्याने भाजपला या निर्णयाचा पश्चात्ताप करावा लागेल, असे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, आरक्षणाचा अधिकार हा केंद्र शासनाकडेच असायला हवा. अशा विधेयकातून चुकीच्या गोष्टी घडण्याचा धोका आहे. आरक्षणांचा विषय सुटण्याऐवजी तो अधिक जटिल होईल. राज्यांवरील केंद्र सरकारचे याबाबतीत कोणतेही नियंत्रण राहणार आहे. भविष्यात भाजपला या गोष्टींचा पश्चात्ताप करावा लागेल.

आधीच केंद्र सरकारने आरक्षणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. ओबीसींचे आरक्षण ३० वरून २७ टक्क्यांवर आणले आहे. आम्हाला ते पूर्ववत ३० टक्के हवे आहे. तेवढेच राजकीय आरक्षणही हवे आहे. ओबीसींच्या कोट्यात अन्य कोणालाही आरक्षण देऊ नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हे आरक्षण पूर्ववत करून द्यावे.

ओबीसीमधील समाविष्ट समाजाची जातवार जनगणना करण्यात यावी. ओबीसी उमेदवारांच्या आरक्षण कोट्याचा विचार करताना जे उमेदवार गुणवत्तेनुसार सर्वसाधारण कोट्यात बसतील त्यांना ओपनच समजावे. त्यांची गणना कोट्याच्या संख्येत करू नये. ओबीसी विद्यार्थ्यांकरिता जिल्हा व तालुकास्तरावर शासनाने वसतिगृहे बांधावीत. धनगर समाजाने पोट शाखेचा उल्लेख टाळून २९ शाखांनी त्यांची जात केवळ धनगर लावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चौकट

म्हणून पडळकर तसे म्हणत असतील...

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केंद्राचा नसून राज्याचा असल्याचे पडळकर सांगत असले तरी वास्तविक हा प्रश्न केंद्र सरकारच्याच अखत्यारितला आहे. राज्यात पक्षाला अनुकूल वातावरण म्हणून पडळकर तसे म्हणत असतील, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.

चौकट

राष्ट्रवादीने काय दखल घेतली?

डांगे म्हणाले की, राष्ट्रवादीत गेल्यानंतर मला पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाले. मात्र, त्या काळात मी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यानंतर पक्षाने माझी दखल घ्यायचे बंद केले.