शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पाटाच्या दराने उपसा योजनांचे पाणी द्या

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

वैभव नायकवडी : आटपाडीत १३ दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद

आटपाडी : उपसा जलसिंचन योजनांची पाणीपट्टी शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यासाठी पाटाने देण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या दरानेच टेंभूसारख्या उपसा जलसिंचन योजनांचे शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. येत्या ३ महिन्यात शासनाने हा निर्णय केला नाही, तर दुष्काळग्रस्तांच्यावतीने संघर्ष उभा करण्याचा इशारा हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी पाणी परिषदेत दिली.कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेची २३ वी पाणी संघर्ष परिषद शुक्रवारी आटपाडीतील भवानी विद्यालयाच्या पटांगणात झाली. प्रारंभी पाणी परिदेचे निमंत्रक क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. आता आटपाडी, सांगोल्यात पाणी गेले. मंगळवेढ्यालाही पाणी गेले पाहिजे. टेंभूच्या मुख्य कालवा, पोटकालव्यांची कामे कालबध्द झाली पाहिजेत. त्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. ही योजना कार्यान्वित होऊन उपयोगी नाही. तिची पाणीपट्टी, वीज बिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. कर्नाटक शासन १० अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्याला मोफत वीज देतेय. यातून आदर्श घेऊन राज्य शासनाने शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी द्यावे. आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, राज्यात ३० हजार कोटी खर्चाच्या सिंचन योजनांचे काम सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत. या भागातील हजारो वर्षांचा दुष्काळ चळवळीच्या जोरावर साकारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू योजनेमुळे हटणार आहे. अर्थमंत्री मुनगंटीवर यांनी येत्या ३० जूनच्या आत ७० कोटी आणि जुलै अधिवेशनात ८० कोटी देण्याचे मान्य केले. हे आश्वासन त्यांनी पाळले नाही, तर चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघर्षाची भूमिका ठरवू. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. शरद पाटील, प्रा. बाबूराव गुरव, चंद्रकांत देशमुख, हणमंतराव देशमुख प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर देशमुख यांची भाषणे झाली. परिषदेस हजारोंच्या संख्येने दुष्काळग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.