शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाटाच्या दराने उपसा योजनांचे पाणी द्या

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

वैभव नायकवडी : आटपाडीत १३ दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद

आटपाडी : उपसा जलसिंचन योजनांची पाणीपट्टी शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यासाठी पाटाने देण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या दरानेच टेंभूसारख्या उपसा जलसिंचन योजनांचे शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. येत्या ३ महिन्यात शासनाने हा निर्णय केला नाही, तर दुष्काळग्रस्तांच्यावतीने संघर्ष उभा करण्याचा इशारा हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी पाणी परिषदेत दिली.कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनतेची २३ वी पाणी संघर्ष परिषद शुक्रवारी आटपाडीतील भवानी विद्यालयाच्या पटांगणात झाली. प्रारंभी पाणी परिदेचे निमंत्रक क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली. आता आटपाडी, सांगोल्यात पाणी गेले. मंगळवेढ्यालाही पाणी गेले पाहिजे. टेंभूच्या मुख्य कालवा, पोटकालव्यांची कामे कालबध्द झाली पाहिजेत. त्यासाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. ही योजना कार्यान्वित होऊन उपयोगी नाही. तिची पाणीपट्टी, वीज बिल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. कर्नाटक शासन १० अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्याला मोफत वीज देतेय. यातून आदर्श घेऊन राज्य शासनाने शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी द्यावे. आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, राज्यात ३० हजार कोटी खर्चाच्या सिंचन योजनांचे काम सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत. या भागातील हजारो वर्षांचा दुष्काळ चळवळीच्या जोरावर साकारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू योजनेमुळे हटणार आहे. अर्थमंत्री मुनगंटीवर यांनी येत्या ३० जूनच्या आत ७० कोटी आणि जुलै अधिवेशनात ८० कोटी देण्याचे मान्य केले. हे आश्वासन त्यांनी पाळले नाही, तर चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघर्षाची भूमिका ठरवू. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. शरद पाटील, प्रा. बाबूराव गुरव, चंद्रकांत देशमुख, हणमंतराव देशमुख प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर देशमुख यांची भाषणे झाली. परिषदेस हजारोंच्या संख्येने दुष्काळग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.महाराष्ट्र सर्वात मागे...पंजाबमध्ये ९८ टक्के, हरियाणात ८५ टक्के, उत्तर प्रदेशात ७० टक्के, मध्य प्रदेशात ३६ टक्के, गुजरातमध्ये ४८ टक्के आणि महाराष्ट्रातून ज्या आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा नदी जाते, तिथे ४९ टक्के, तर कर्नाटकात ३४ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात देशात सर्वात कमी १८ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यापैकी ९ टक्के जमीन ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विहिरी पाडून बागायती केली आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील शेतीचा विकास करावा लागेल आणि शेतीचा विकास करायचा, तर शासनाने सिंंचनाची व्यवस्था केली पाहिजे, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेत व्यक्त केले.