शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रवादीच्या ताब्यात महाराष्ट्राची सत्ता द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात प्रचाराची सांगता; सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास साधला

इस्लामपूर : समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन विकासाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातात हे राज्य देण्यासाठी १५ तारखेस मतदान करा, असे आवाहन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील केले.इस्लामपूर येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, इस्लामपूर शहराने प्रत्येक निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन माझी पाठराखण केली आहे़ मी १५ वर्षे सरकारमध्ये काम करताना जे-जे देशात, राज्यात चांगले आहे ते-ते या शहरात, तालुक्यात आणण्याचे जाणीवपूर्वक काम केले़ आमच्या सरकारने मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण लागू केले़ लिंगायत व जैन समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देऊन त्यांच्यातील काही जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला़ ग्रामविकास खाते देशात अग्रभागी ठेवले आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, या मतदारसंघात भाजप-शिवसेनेस उमेदवार मिळाला नाही़ ्न्नराज्यातील कोणत्याही विरोधी नेत्याने येथे सभा घेतली नाही़ याचाच अर्थ त्यांनी पराभव मान्य केला आहे़ पक्षाचे डोळे उघडण्यासाठी जयंतरावांना एक लाखाच्या फरकाने निवडून द्या.प्रा़ मच्छिंद्र सकटे म्हणाले, ज्याप्रमाणे मोदींच्या पाठीशी गुजरात राज्य आणि गुजराती माणूस उभा राहिला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य व मराठी माणूस शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला नाही़ या निवडणुकीत त्यांना ताकद देण्यासाठी मतदान करा.यावेळी माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, पै़ भगवान पाटील, अ‍ॅड़ सुधीर पिसे, नगरसेवक खंडेराव जाधव, निशिकांत पाटील, मुकुंद कांबळे, सौ़ रोझा किणीकर, एल़ के. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिलीपराव पाटील, प्रा़ शामराव पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, चिमण डांगे, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, वाय़ एस. जाधव, उद्योगपती सुरेंद्र पाटील, विलास भिंगार्डे, मुनीर पटवेकर, पिरअली पुणेकर, विजय कोळेकर, नंदकुमार कुंभार उपस्थित होते़ शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले़ माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)