शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

जतच्या दुष्काळ मुक्तीसाठी ‘म्हैसाळ’ला निधी द्या

By admin | Updated: October 27, 2015 00:10 IST

विलासराव जगताप : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी मागणी; तालुक्याचे विभाजनही तातडीने करण्याची गरज

जत : जत तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून उर्वरित कामासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा आ. विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जत तालुका दौऱ्याच्यानिमित्ताने व्यक्त केली आहे.जत तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून त्याचा भौगोलिक विस्तार जादा आहे. १२० कि.मी. इतकी पूर्व-पश्चिम लांबी आहे. तालुका विभाजनाचा प्रश्न १९८४ पासून प्रलंबित आहे. प्रत्येकवेळी तालुका विभाजनाची मागणी केली जात आहे. परंतु आजपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदार आणि जनतेला तालुका विभाजन करण्याचे आश्वासन दिले आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने त्याची पूर्तता व्हावी, अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.पूर्व भागातील ७२ गावांसाठी नगारटेक (जत) येथून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा नियोजित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना मंजूर होऊन सुरु झाल्यानंतर पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. याशिवाय पाणीटंचाई कालावधित टँकरवर प्रतिवर्षी होणाऱ्या लाखो रुपये खर्चाची बचत होणार आहे. नियमित आणि वेळेवर शुद्ध पाणी नागरिकांना मिळू लागल्यानंतर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शासनाने या प्रस्तावित योजनेस तात्काळ मंजुरी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.खरीप हंगामातील गावांचा शासनाने दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. उर्वरित रब्बी हंगामातील ७२ गावांचाही शासनाने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे आवश्यक आहे. तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. आता आठ-दहा दिवसात पाऊस झाला नाही, तर रब्बी हंगामही वाया जाणार आहे. सध्या या कडक उन्हामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिके करपू लागली आहेत. खरीपप्रमाणे रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शासनाने ७२ गावांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करुन येथील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. (वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियानातून दहा कोटींची कामेजलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत शासनाने तालुक्यातील ४२ गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे या गावात शासनाने सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून सिमेंट नालाबांध, पाझर तलाव, नालाबांध, तलावातील गाळ काढणे आदी कामे करून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे व पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. जत तालुक्यावर असलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरुपी पुसण्यासाठी संपूर्ण जत तालुक्याचा जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमात समावेश करुन तेथे जमिनीखालील पाणीपातळी वाढविणारे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.