शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडावल्या

By admin | Updated: April 1, 2015 00:08 IST

गळिताची सरासरी घटली : अपेक्षित दराअभावी शेतकऱ्यांचा तोटा

सहदेव खोत -पुनवत  -गेले तीन-चार महिने शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या गुऱ्हाळांचा हंगाम आता संपला आहे. तालुक्यातील काही गूळ कलमांना मिळालेला पाच-सहा हजाराच्या आसपास, तर कणदूरच्या गूळ मोदकांना मिळालेला नऊ हजाराचा दर वगळता, यावर्षी सर्वच गुऱ्हाळांतील शेतकऱ्यांना सरासरी तीन हजारच दर मिळाल्याने, तोटा झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ हंगामाची सुरुवात गेल्या दिवाळीदरम्यान झाली. गुऱ्हाळ मालकांनी मोठे भांडवल गुंतवून गळिताला सुरुवात केली. वास्तविक शिराळा तालुक्यातील गुळाला, विशेषत: कणदूरच्या गुळाला चांगला दर्जा असल्याने यावर्षी चांगला दर मिळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली.यावर्षी गूळ दराची सुरुवात प्रति क्विंटल दोन हजारानेच झाली. पहिल्या एक-दोन महिन्यात तर शेतकऱ्यांना २०००, २२००, २४००, २६०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांची निराशाच झाली. संक्रांतीच्या दरम्यान गूळ भाव वधारण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दर मिळाला नाही.तालुक्यातील असंख्य गुऱ्हाळघरे गळिताला ऊस नसल्याने महिन्यापूर्वीच बंद झाली आहेत. तालुक्यात सुमारे २५ गुऱ्हाळ घरांतून यावर्षी सुमारे सव्वालाख टन उसाचे गाळप झाले. मात्र वाढलेला उत्पादन खर्च व गूळ दरात झालेली घसरण यामुळे गुऱ्हाळापेक्षा कारखानेच बरे, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.एकंदरीत गेल्यावर्षी काही कलमे ७००० रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र यावर्षी हा दर ६००० रुपयांच्या आसपासच राहिला, तर सरासरी दर ३००० ते ३५०० रुपयांपर्यंतच राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती राहिली. गुऱ्हाळ मालकांची धडपडअपेक्षित दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळातील गळिताकडे यंदा पाठ फिरविली. अशावेळी गुऱ्हाळ उद्योग टिकविण्यासाठी फायद्या-तोट्याचा विचार न करता, शेतकऱ्यांचा उभा ऊस ठरवून घेऊन त्या उसावर काहीकाळ गुऱ्हाळघरे चालवली व कामगारांना गुंतवून ठेवले. शेतकऱ्यांनी सुद्धा नफ्या-तोट्याचा विचार न करता उभा ऊस ठरवून गुऱ्हाळ मालकांना विकून एकरकमी पैसे घेतले.यावर्षी ३००० ते ३५०० पर्यंतच सरासरी राहिल्याने शेतकऱ्यांसह गुऱ्हाळ मालकांना फटका बसला आहे. अनेकांच्या प्रतिवर्षी दोन लाखांवर निघणाऱ्या गूळपट्ट्या यावर्षी दराअभावी निम्म्यानेच निघाल्या आहेत. दराअभावी यावर्षीचा हंगाम तोट्यात गेला आहे.- प्रदीप पाटील, गुऱ्हाळ मालक, कणदूर