शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

इथेच कर्ज घ्या अन् इथेच गुंतवणूक करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:59 IST

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडकनाथ प्रकरणातून सुधीर आणि संदीप मोहितेने गुंतवणूकदारांना पद्धतशीर गंडा घातला. त्यासाठी ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कडकनाथ प्रकरणातून सुधीर आणि संदीप मोहितेने गुंतवणूकदारांना पद्धतशीर गंडा घातला. त्यासाठी ‘रयत’चे नाव ‘महारयत’ करून कंपन्यांची साखळीच तयार केली. वेगवेगळ्या उद्देशाने नऊ वेगवेगळ्या कंपन्या काढल्या. कोंबडी खाद्याच्या निर्मितीसाठी कारखाना सुरू केला. गुंतवणूकदारांसाठी कर्ज देण्याचीही सोय या महाठगांनी केली. त्यासाठी महारयत निधी लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. इथेच कर्ज घ्या आणि इथेच गुंतवा, हे त्यामागचे सूत्र!कडकनाथ कोंबडी पालनाच्या साखळी योजनेत गुंतवणूकदार फशी पडत असल्याचे पाहून सुधीरने कंपनीचा विस्तार सुरू केला. संचालक जमा केले. काहींना तर फसवून संचालक बनवले. अटक करण्यात आलेला अंबक-चिंचणीचा हणमंत जगदाळे त्यातलाच. झेरॉक्स आणि पेपर विकण्याचा व्यवसायातून संसाराचा गाडा कसाबसा ओढणारा. सुधीर आणि तो खासगी क्लासेस चालवत. त्या ओळखीतून कोंबडीपालनासाठी कंपनी काढू म्हणून सुधीरने नोंदणीवेळी त्याच्या सह्या घेतलेल्या.मग ‘रयत’मधून महारयत अ‍ॅग्रो, महारयत निधी बँक लिमिटेड, झेडएम मल्टिसर्व्हिसेस, रयत रेस्टो हॉटेल्स, महारयत अ‍ॅग्रो फिडस् अ‍ॅन्ड फूड्स, महारयत फाऊंडेशन, रयत हॅचरीज, रयत चिकन, महारयत एज्युकेशन इन्स्टिट्यूट या आणखी नऊ कंपन्या काढल्या. काही नुसत्याच कागदावर, तर काही प्रत्यक्ष कार्यरत. अ‍ॅग्रो फिडस् अ‍ॅन्ड फूड्स कंपनी संदीपच्या नावावर. या कंपनीकडून कोंबडी खाद्याची निर्मिती होते. त्याचा कारखाना इस्लामपुरात काढण्यात आला. गुंतवणूकदारांना तेथूनच खाद्याचा पुरवठा व्हायचा.महारयत अ‍ॅग्रोमध्ये रोहित पुराणिक, प्रीतम माने, मृगेंद्र कदम, विजय शेंडे यांनाही संचालक केले, तर गणेश शेवाळे, मनोज देशमुख, वसीम इबुशे हे स्टार प्रचारक. यातला गणेश शेवाळे राजकीय कार्यकर्ता. शेतकरी संघटनांशी संबंधित. नेत्यांच्या मोटारीतून फिरणारा, त्यांच्या पोरांची पाठराखण करणारा.जोरात जाहिरातबाजी झाली. सुधीरच्या मुलाखती चॅनेल्सवर झळकल्या. ही ‘यशोगाथा’ महाराष्टÑासह शेजारच्या कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत गेली. यांचे सुरुवातीचे ‘टार्गेट’ होते सामान्य शेतकरी. नंतर बागायतदार, सेवानिवृत्त शिक्षक-नोकरदार, बेरोजगार, छोटे व्यावसायिक यांनाही भुरळ घातली गेली. सायकलवर फिरणाऱ्याला मर्सिडिस मोटारीतून फिरण्याचे स्वप्न दाखवले गेले. कमी भांडवलात, कमी वेळेत चांगला नफा मिळतोय म्हटल्यावर गुंतवणूकदार वाढले. गुंतवणुकीची रक्कम रोखीनेच घेतली जायची. ज्यांची पैशाची जुळणी होत नव्हती, त्यांच्यासाठी कर्ज देण्याचीही सोय या महाठगांनी केली. त्यासाठी महारयत निधी या कंपनीची स्थापना झाली.कंपनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करार करून घ्यायची. ‘आमची कंपनी रेशीम, मत्स्य, कुक्कुटपालन व शेळीपालनाचा व्यवसाय करत आहे. या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करून देणे, व्यवसायातून तयार होणारा माल खरेदी करणे ही उद्दिष्टे आहेत. कंपनी अंडी आणि पक्षी खरेदीची हमी देते. कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत नाही.’ हा त्यावरचा छापील मजकूर. मात्र त्यावरच्या सह्या बोगस. शिवाय सह्यांखाली नावांचा उल्लेखच नाही! प्रकरण उघडकीस आल्यावर गुंतवणूकदारांना हे समजलं! सगळाच बोगस व्यवहार!राजकीय नेतेही बनले ‘अडकनाथ’‘कडकनाथ’चा गंडा घालून घेण्यात राजकीय मंडळीही कमी नाहीत! काही कार्यकर्त्यांनी जमिनीचे तुकडे विकून, कर्ज काढून कोंबड्यांची शेड उभी केली. कामेरीच्या एकाने पंधरा लाख या धंद्यात लावले, तर इस्लामपुरातील भाजपच्या बड्या पदाधिकाºयाने २६ लाखाच्या कोंबड्या घेऊन झोकदार पोल्ट्री फार्म काढला. कंपनीने हात वर केल्यावर हे सगळे तोंड मिटून गप्प आहेत. (क्रमश:)