शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

सांगलीच्या मातीतलं अस्सल सोनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

सांगलीच्या मातीतून पिकणारे अस्सल सोने म्हणून येथील राजापुरी हळदीची ओळख जगभरात होते. सर्वप्रकारच्या हळदीत सर्वाधिक भरपूर औषधी गुणधर्म सांगलीच्या ...

सांगलीच्या मातीतून पिकणारे अस्सल सोने म्हणून येथील राजापुरी हळदीची ओळख जगभरात होते. सर्वप्रकारच्या हळदीत सर्वाधिक भरपूर औषधी गुणधर्म सांगलीच्या हळदीला मिळाले. म्हणूनच जागतिक बाजारात तब्बल सव्वाशे वर्षांपासून या हळदीचे राज्य सुरू आहे.

मनाला मोहित करणारा सुगंध, केशरचा रंग, जिभेला भावणारी चव अशा अनेक वैशिष्ट्यांनी सांगलीच्या हळदीला साज चढविला आहे. म्हणून जागतिक स्तरावर या हळदीला भारतीय केसर (इंडियन सॅफ्रन) असे संबोधले जाते.

सांगलीची हळद म्हणून तिला जी. आय. (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे. त्यामुळे सांगलीची ही खासीयत म्हणून सिद्ध झाली आहे. सांगलीची हळद असताना तिला राजापुरी नाव कसे पडले, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागेही रंजक कहाणी आहे. सांगलीच्या बाजारातून ही हळद रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बंदरात जाऊन तिथून तो माल विदेशात जायचा. त्यामुळे राजापुरी हळद असे त्यास नाव पडले. राजापूर आणि हळदीचा काही संबंध नाही. केवळ बंदरामुळे हळदीस ते नाव मिळाले.

सांगलीच्या हळद व्यापाराने २०२१ मध्ये १११ वर्षे पूर्ण केली आहेत. येथील काही व्यापार्‍यांनी एकत्र येऊन १९१० मध्ये हळदीचा वायदे बाजार सुरू केला. त्यावेळी व्यापारी एकमेकांच्या शब्दावर विश्वास ठेवून वायदे व्यवहार करत. व्यवहारांचे नियंत्रण करणारी संस्था किंवा पैशांच्या देव-घेवीसाठी क्लिअरिंग हाऊसची सोय त्यावेळी नव्हती. कायद्याचेही नियंत्रण नव्हते. स्वातंत्र्यानंतर फॉर्वर्ड कॉण्टॅक्टस (रेग्युलेशन) ॲक्ट १९५२ मध्ये अमलात आला. त्यापासून प्रेरणा घेऊन सांगलीच्या व्यापारी मंडळींनी वायदे व्यवहाराचे आयोजन व नियंत्रण करण्यासाठी 'द स्पायसेस अँड ऑईल सीडस एक्स्चेंज लि.' या कंपनीची स्थापना केली होती. येथे अजूनही हळदीवर प्रक्रिया करणारे ५० हून अधिक कारखाने आहेत.