शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धुळगावमधील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात

By admin | Updated: January 9, 2015 00:11 IST

वैद्यकीय पथकाकडून पाहणी : आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार

सोनी/तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथे दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची साथ आली असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, आज (गुरुवारी) दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आला नसून, सध्या साथ आटोक्यात आली आहे. सायंकाळपर्यंत आठ नवीन रुग्णांवर आरोग्य उपकेंद्रातून उपचार करण्यात आले. साथ नियंत्रणात आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.धुळगाव येथे दोन दिवसांपासून जुलाब, उलटी व तापाचा अचानक त्रास होऊ लागल्याने व ही सर्व लक्षणे गॅस्ट्रोची असल्याने वैद्यकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली होती. सांगली-मिरजेसारखी स्थिती येथे होऊ नये म्हणून मोठ्याप्रमाणात काम चालू केले होते.शंभरावर ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णांच्या घरीच उपचार सुरू होते. तातडीने उपचार झाल्याने लागण झालेल्या रुग्णांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होऊन साथ आटोक्यात आली आहे. नवीन रुग्ण आढळला नसला तरी, गावामध्ये सर्वांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी, प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. आज दुपारी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती गजानन कोठावळे, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली .सरपंच जाफर मुजावर यांनी सांगितले की, गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे पाणी दूषित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे पाणी दूषित आल्याने साथ पसरली आहे. प्रादेशिकची जलवाहिनी बदलण्याची मागणी करणार आहे. (वार्ताहर)मुख्य जलवाहिनीला गळती२४ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी बंद होते. यादरम्यान विहिरीतून पाणी पुरवठा सुरु केला होता. दि. ४ पासून प्रादेशिक योजना पूर्ववत सुरू झाली. या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती असल्यामुळे व पूर्वीचे शिल्लक पाणी बाहेर जाऊ न देता थेट लोकांपर्यंत गेल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा झाला.गावात सध्या जिल्हास्तरीय वैद्यकीय पथकाने तळ ठोकला असून, गळती शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. आरोग्य विभागाच्या सहा कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. गावात सर्वत्र पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे.