शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

गॅस्ट्रोमुळे मिरजेत एकाचाही बळी नाही!

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल सादर : महापालिका प्रशासनाचे न्यायालयात घूमजाव

मिरज : गॅस्ट्रोच्या साथीने मिरजेत सुमारे १४ जणांचा बळी गेला, पण महापालिका प्रशासनाने मात्र, मिरजेत गॅस्ट्रोची साथ नव्हती व एकाही रूग्णाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. शहर सुधार समितीने वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे महापालिकेविरूध्द केलेला दावा फेटाळण्यात यावा, असे म्हणणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी न्यायालयात सादर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचा बळी गेला. दूषित पाण्याने हजारो नागरिकांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची लागण होऊन मिरजेतील चौदा जणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याबद्दल शहर सुधार समितीने महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्यावर फौजदारी दाखल करून, आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. याबाबत न्यायालयाने म्हणणे सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर गेले तीन महिने टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेने, मिरजेत गॅस्ट्रोची साथच नव्हती, केवळ जुलाब व उलट्या अशी लक्षणे असलेल्या ६८२ रूग्णांवर उपचार करण्यात आल्याचा पवित्रा न्यायालयात घेतला आहे. १९ नोव्हेंबरपासून जुलाब व उलट्या या लक्षणांमुळे ब्राह्मणपुरी, विजापूर वेस, दिंडी वेस, वखार भाग, कोकणे गल्ली, उदगाव वेस, पंचशीलनगर, गुरूवार पेठ, समतानगर परिसरातील ६८२ जणांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. अतिसार रोखण्यासाठी शहरात रूग्णांचे सर्वेक्षण, उपचार, ५०४० कुटुंबांना मेडीक्लोअरचे वाटप, उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यास व विक्रीस प्रतिबंध करण्यात आला. जुन्या जलवाहिन्या धुऊन काढण्यात आल्या. जुन्या जलवाहिन्यांद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ३१० ठिकाणी जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली. शहरात ८०९ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ७६० पिण्यायोग्य व ४९ पिण्यास अयोग्य आढळले. पाणी अशुध्द आढळलेल्या ठिकाणी जलवाहिन्यांची दुरूस्ती करून, पाणी उकळून-गाळून पिण्याबाबत जनजागृती व प्रबोधन केले. प्रतिबंधक उपाययोजना केल्यामुळे कोणीही गॅस्ट्रोचा रूग्ण आढळलेला नाही. अब्दुल लतीफ शेख या वृध्दासह १४ जणांच्या मृत्यूबाबत डॉ. राजेंद्र भागवत यांच्या समितीने चौकशी केली. मात्र एकाचाही मृत्यू गॅस्ट्रोने झाल्याचे आढळले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने न्यायालयात केला आहे. याबाबत वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेल्या गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला कोणताही वैद्यकीय आधार नसल्याने, वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे केलेला सुधार समितीचा अर्ज फेटाळण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी केली आहे. महापालिकेच्या या विश्वामित्री पवित्र्याबाबत जिल्हा सुधार समितीचे वकील अमित शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गॅस्ट्रो साथीबाबत खोटा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे न्यायालयात पितळ उघडे पडणार आहे. विधानसभेतील लक्षवेधीवेळी तीन रूग्णांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कबूल केले होते, असे अ‍ॅड. शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)महापालिकेचे घूमजावमिरजेतील गॅस्ट्रोच्या साथीत किती बळी गेले व महापालिकेने काय उपाययोजना केल्या, हा प्रश्न आ. अनिल बाबर यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर, महापालिका प्रशासनाने कॉलऱ्याची लागण होऊन मिरजेत आनंदा कांबळे यांचा एकच बळी गेला व ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मिरजेत एकूण ६८२ रूग्णांवर उपचार करण्यात आले. रूग्णांचे सर्वेक्षण व उपाययोजना करून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणल्याचा दावा केला होता. मात्र असे काही घडलेच नसल्याचा पवित्रा न्यायालयात घेऊन महापालिका प्रशासनाने आश्चर्याचा धक्काच दिला आहे.