शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

किल्लेमच्छिंद्रगड येथे गॅस्ट्रो, काविळीने दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST

शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, ...

शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, तर ३० वर्षीय तरुणाचा काविळीने मृत्यू झाला आहे. एकाचदिवशी दूषित पाण्याचे दोन बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गावचे शेतकरी अधिक उत्पन्नासाठी शेतीत खत म्हणून मळी तसेच मळीमिश्रित पाण्याचा वापर करतात. मळीतील अर्क आणि मळीमिश्रित दूषित सांडपाणी पिकासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यासोबत जमिनीत जिरल्याने सपकाळ खोरी, सय्यद-आगा मळा, कणसे मळा परिसरातील सर्व विहीर, बोअरचे पाणी खराब झाले आहे. पाण्याला तांबूस रंग आला आहे. पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे बंद झाले आहे. प्रदूषित पाणी पिण्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली अनेक वर्षे गावास स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोट

गावालगतच्या भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रदूषण विभागाकडे तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. वेळीच दखल घेऊन प्रदूषण रोखले असते, तर दोन नागरिकांचे हकनाक बळी गेले नसते.

राहुल निकम,

उपसरपंच, ग्रामपंचायत, किल्लेमच्छिंद्रगड