शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

किल्लेमच्छिंद्रगड येथे गॅस्ट्रो, काविळीने दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST

शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, ...

शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, तर ३० वर्षीय तरुणाचा काविळीने मृत्यू झाला आहे. एकाचदिवशी दूषित पाण्याचे दोन बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गावचे शेतकरी अधिक उत्पन्नासाठी शेतीत खत म्हणून मळी तसेच मळीमिश्रित पाण्याचा वापर करतात. मळीतील अर्क आणि मळीमिश्रित दूषित सांडपाणी पिकासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यासोबत जमिनीत जिरल्याने सपकाळ खोरी, सय्यद-आगा मळा, कणसे मळा परिसरातील सर्व विहीर, बोअरचे पाणी खराब झाले आहे. पाण्याला तांबूस रंग आला आहे. पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे बंद झाले आहे. प्रदूषित पाणी पिण्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली अनेक वर्षे गावास स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोट

गावालगतच्या भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रदूषण विभागाकडे तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. वेळीच दखल घेऊन प्रदूषण रोखले असते, तर दोन नागरिकांचे हकनाक बळी गेले नसते.

राहुल निकम,

उपसरपंच, ग्रामपंचायत, किल्लेमच्छिंद्रगड