शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

By admin | Updated: July 6, 2016 00:20 IST

खून का बदला खून : पोलिसांच्या कारवाईला मरगळ आल्याने गुंडांचे फावले

सचिन लाड -- सांगली -‘खून का बदला खून’ आणि ‘वर्चस्व’ या दोन मुद्यांवरून शहरात गेल्या दहा वर्षांत अनेकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. यातून डझनभर गुंडांची ‘गेम’ करण्यात आली. एकापाठोपाठ एक अशा विरोधी टोळीतील गुंडांचा खात्मा करण्याची मालिकाच सुरू आहे. भरदिवसा खून करून हे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सहिसलामत बाहेर येत असल्याने टोळीयुद्ध धगधगतच आहे. गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढता राहिल्याने ‘नाट्यपंढरी’ अशी सांगलीची ओळख लोप पावत आहे.सोमवारी रवींद्र कांबळे या गुंडाचा गोकुळनगरमध्ये भरदिवसा खून झाल्याने शहरातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुंड अकबर आत्तार, दाद्या सावंत, अजय माने, रफिक शेख, विठ्ठल शिंदे, संजय पोतदार, सोमनाथ सकपाळ, विजय पवार, मिर्झा, अशोक सरगर, रशीद शेख अशा अनेक गुंडांचा टोळीयुद्धातून खात्मा झाल्याचे सांगलीकरांनी पाहिले आहे. एखाद्या घटनेचा अपवाद सोडला, तर बहुतांशी खून भरदिवसा झाले आहेत. प्रत्येकाचा खून करताना दगडाचा वापर करण्यात आला. राजकीय आश्रय, अवैध व्यावसायिकांचे पाठबळ या जोरावर उपनगरांत गुंडांच्या टोळ्या आजही सक्रिय आहेत. ते खिशात किंवा कमरेला नेहमीच हत्यार लावून असतात. शहरात किंवा ते राहात असलेल्या भागात वर्चस्व कोणाचे? या मुद्यावर गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष राहिला आहे. संजयनगर, गोकुळनगर, शंभरफुटी रस्ता, जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, संपत चौक, अहिल्यानगर, प्रेमनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, शामरावनगर ही ठिकाणे नेहमीच संवेदनशील राहिली आहेत. सातत्याने याठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न व मारामारीच्या घटना घडल्या आहेत.गेल्या दहा वर्षांत टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’ झाली आहे. एक-दोन खुनाचे अपवाद सोडले तर, अन्य गुन्ह्यांतून हे गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेणे, पोलिसांच्या निष्क्रियतेचा लाभ घेणे, दहशत माजवून साक्षीदारांवर दबाव आणणे असे प्रकार या टोळ्यांकडून होत आहेत. गुंडाविरुद्ध तक्रार आली तर पोलिसांकडून तातडीने कारवाईची पावले उचलली जात नाहीत. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जात नाही. त्यांना तपासले जात नाही. परिणामी गल्ली-बोळात नवीन फाळकूट दादा तयार होत आहेत. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर या पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा नुसती कागदावरच अस्तित्वात आहे. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची कारवाई कधीच प्रकर्षाने दिसत नाही. प्रलंबित गुन्ह्यांचाही त्यांना छडा लावता येत नाही. गुन्हेगारांचे डोके पुन्हा वरतत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांचा जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाल संघर्षाचा राहिला. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात त्यांचा हातखंडा होता. कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची ते नेहमी माहिती ठेवत. त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असे. एखादी तक्रार आली की संबंधित गुंडास तातडीने आत टाकण्याचे आदेश देत. त्यांना घाबरून अनेक टोळ्यांतील गुन्हेगार शांत होते. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने विविध मोहीम राबवत. त्यांची बदली होताच म्हमद्या नदाफसह अनेक टोळ्यांनी डोके वर काढले. सध्याचे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना पदभार घेऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यांचीही ‘डॅशिंग’ पोलिसप्रमुख म्हणून ओळख आहे. त्यांनी कारवाईची दिशा यापूर्वीच स्पष्ट केली आहे.