शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’

By admin | Updated: July 6, 2016 00:20 IST

खून का बदला खून : पोलिसांच्या कारवाईला मरगळ आल्याने गुंडांचे फावले

सचिन लाड -- सांगली -‘खून का बदला खून’ आणि ‘वर्चस्व’ या दोन मुद्यांवरून शहरात गेल्या दहा वर्षांत अनेकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. यातून डझनभर गुंडांची ‘गेम’ करण्यात आली. एकापाठोपाठ एक अशा विरोधी टोळीतील गुंडांचा खात्मा करण्याची मालिकाच सुरू आहे. भरदिवसा खून करून हे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सहिसलामत बाहेर येत असल्याने टोळीयुद्ध धगधगतच आहे. गुन्हेगारीचा आलेख नेहमीच चढता राहिल्याने ‘नाट्यपंढरी’ अशी सांगलीची ओळख लोप पावत आहे.सोमवारी रवींद्र कांबळे या गुंडाचा गोकुळनगरमध्ये भरदिवसा खून झाल्याने शहरातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुंड अकबर आत्तार, दाद्या सावंत, अजय माने, रफिक शेख, विठ्ठल शिंदे, संजय पोतदार, सोमनाथ सकपाळ, विजय पवार, मिर्झा, अशोक सरगर, रशीद शेख अशा अनेक गुंडांचा टोळीयुद्धातून खात्मा झाल्याचे सांगलीकरांनी पाहिले आहे. एखाद्या घटनेचा अपवाद सोडला, तर बहुतांशी खून भरदिवसा झाले आहेत. प्रत्येकाचा खून करताना दगडाचा वापर करण्यात आला. राजकीय आश्रय, अवैध व्यावसायिकांचे पाठबळ या जोरावर उपनगरांत गुंडांच्या टोळ्या आजही सक्रिय आहेत. ते खिशात किंवा कमरेला नेहमीच हत्यार लावून असतात. शहरात किंवा ते राहात असलेल्या भागात वर्चस्व कोणाचे? या मुद्यावर गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष राहिला आहे. संजयनगर, गोकुळनगर, शंभरफुटी रस्ता, जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, संपत चौक, अहिल्यानगर, प्रेमनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, शामरावनगर ही ठिकाणे नेहमीच संवेदनशील राहिली आहेत. सातत्याने याठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न व मारामारीच्या घटना घडल्या आहेत.गेल्या दहा वर्षांत टोळीयुद्धातून डझनभर गुंडांची ‘गेम’ झाली आहे. एक-दोन खुनाचे अपवाद सोडले तर, अन्य गुन्ह्यांतून हे गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेणे, पोलिसांच्या निष्क्रियतेचा लाभ घेणे, दहशत माजवून साक्षीदारांवर दबाव आणणे असे प्रकार या टोळ्यांकडून होत आहेत. गुंडाविरुद्ध तक्रार आली तर पोलिसांकडून तातडीने कारवाईची पावले उचलली जात नाहीत. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जात नाही. त्यांना तपासले जात नाही. परिणामी गल्ली-बोळात नवीन फाळकूट दादा तयार होत आहेत. सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर या पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा नुसती कागदावरच अस्तित्वात आहे. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची कारवाई कधीच प्रकर्षाने दिसत नाही. प्रलंबित गुन्ह्यांचाही त्यांना छडा लावता येत नाही. गुन्हेगारांचे डोके पुन्हा वरतत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांचा जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाल संघर्षाचा राहिला. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात त्यांचा हातखंडा होता. कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची ते नेहमी माहिती ठेवत. त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असे. एखादी तक्रार आली की संबंधित गुंडास तातडीने आत टाकण्याचे आदेश देत. त्यांना घाबरून अनेक टोळ्यांतील गुन्हेगार शांत होते. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने विविध मोहीम राबवत. त्यांची बदली होताच म्हमद्या नदाफसह अनेक टोळ्यांनी डोके वर काढले. सध्याचे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना पदभार घेऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यांचीही ‘डॅशिंग’ पोलिसप्रमुख म्हणून ओळख आहे. त्यांनी कारवाईची दिशा यापूर्वीच स्पष्ट केली आहे.