शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

इस्लामपुरातील गणेश भाजी मंडई पूर्ववत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

इस्लामपूर : अनेक दशकांपासून सकाळच्या वेळेत भरणाऱ्या गणेश भाजी मंडईतील स्थलांतराचा प्रश्न निकाली काढत स्थानिक नागरिकांना आणि वाहतुकीस अडथळा ...

इस्लामपूर : अनेक दशकांपासून सकाळच्या वेळेत भरणाऱ्या गणेश भाजी मंडईतील स्थलांतराचा प्रश्न निकाली काढत स्थानिक नागरिकांना आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचे काटेकोर पालन आणि नियोजन करून गणेश भाजी मंडई भरविण्यात यावी, असा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला. त्यामुळे कपिल ओसवाल, शाकीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील वाळवा तालुका संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले.

पालिका प्रशासनाने शिराळा नाका परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत जुन्या गणेश मंडईतील शेतकरी, व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संघर्ष समितीने ही मंडई व्यापारी, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीची आहे. या मंडईला अनेक दशकांचा इतिहास आहे. त्यामुळे ती तेथेच भरविण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती.

पालिका सभेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गणेश भाजी मंडईत भाजीपाला बाजार भरविण्याचा निर्णय घेताना त्या परिसरातील स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राहील आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. मंगळवारी सकाळी त्यांनी मंडईला भेट देऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. विक्रेत्यांच्या वतीने नगराध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक वैभव पवार, शाकीर तांबोळी, कपिल ओसवाल, गजानन फल्ले, मन्सूर वाठारकर, हमीद अत्तार, सुमंत कुलकर्णी, भास्कर कदम, पक्षप्रतोद विक्रम पाटील, शकील सय्यद, प्रदीप लोहार, अन्नपूर्णा फल्ले उपस्थित होते.

फोटो - २३०२२०२१-आयएसएलएम-भाजी मंडई न्यूज

इस्लामपूर येथील गणेश भाजी मंडई पूर्ववतपणे भरल्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.