शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

गणराया, आयुक्तांना कामांबाबत सुबुद्धी दे! सांगली महापालिकेत महाआरती : तिसºया दिवशीही आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:41 IST

सांगली : महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली.

ठळक मुद्देमहापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला परंतु आंदोलकांनी निर्णय झाल्यावर माघार घेऊ, असा पवित्रा घेतला

सांगली : महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली. आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे तिसºया दिवशीही आंदोलन सुरूच होते. विकासकामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी दिला.

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रभागातील विकासकामे अडविली जात असून ती मार्गी लागावीत, या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीच्यावतीने गणरायाच्या आरतीचे आयोजन केले होते. सुरूवातीला गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडेही घातले गेले. आंदोलनस्थळी डिजिटल फलकही लावण्यात आला आहे. त्यावर ‘आता तरी विकासकामे थांबवू नका’, असे आयुक्तांना आवाहन केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आंदोलनाची जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दखल घेतली आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, सागर घोडके, विनया पाठक, प्रकाश व्हनकडे, मनोज भिसे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या कामांना मंजुरी देऊन वर्कआॅर्डर द्याव्यात, नगरसेवकांना इंटरेस्ट असल्याचे सांगून विकासकामे अडविली जात आहेत, त्यातून जनतेची दिशाभूल होत असून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, गेल्या दीड वर्षात आयुक्तांनी १८८ कोटीची कामे केली असतील, तर त्याच्या वर्कआॅर्डर कधी देण्यात आल्या, हे जाहीर करावे, आदी मागण्या या निवेदनात केल्या.

आंदोलनात नगरसेवक विष्णू माने, प्रा. पद्माकर जगदाळे, अल्लाउद्दीन काझी, आशा शिंदे, संगीता हारगे, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, अंजना कुंडले, स्नेहल सावंत, आनंदा देवमाने, अभिजित हारगे, प्रसाद मदभावीकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांची : मध्यस्थीसंजय बजाज व शेडजी मोहिते यांनी, नगरसेवक-पदाधिकारी विरुद्ध आयुक्त या सुरू असलेल्या संघर्षात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मध्यस्थी करावी, यासाठी साकडे घातले. यावेळी श्री. काळम-पाटील यांनी आयुक्त-नगरसेवकांना एकत्र बसवून दोन दिवसात चर्चा घडवू. कुठे घोडे अडले हे तपासू, असे आश्वासन दिल्याचे बजाज यांनी सांगितले. तोपर्यंत आंदोलन थांबवावे, अशी मागणी केली. परंतु आंदोलकांनी निर्णय झाल्यावर माघार घेऊ, असा पवित्रा घेतला आहे.