शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

गडकरींच्या घोषणेचा फुगा फुटणार काय?

By admin | Updated: December 10, 2014 23:45 IST

शिवाजीराव नाईक समर्थक अस्वस्थ : सदाभाऊ खोत यांच्याही मंत्रिपदाची शक्यता धुसर

अशोक पाटील - इस्लामपूर -‘तुम्ही निवडून द्या, कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी’, अशा वल्गना करुन मतांचा जोगवा मागणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेचा फुगा फुटणार काय? अशीच चर्चा वाळवा—शिराळा तालुक्यात आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने, गडकरींच्या त्या घोषणेवर आजही प्रश्नचिन्ह आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवाजीराव नाईक यांचा समावेश न केल्याने त्यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपुरते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांचे सहकार्य घेतले. तेव्हापासून शेट्टी यांनी ‘रात गयी बात गयी’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाईक व खोत यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. शिराळा मतदारसंघात कामेरी हे महत्त्वाचे गाव मानले जाते. या गावाच्या भूमिकेवरच शिराळ्याचा आमदार ठरतो. याच गावात शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी, ‘नाईक यांना विजयी करा, त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी’, अशी घोषणा केली होती. या त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून येथील जनतेने शिवाजीराव नाईक यांना मतदान करुन विजयी केले. मतदारांनी त्यांचे काम केले, परंतु गडकरी यांनी मात्र त्यांचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्याने शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला. याच पार्श्वभूमीवर नाईक आणि खोत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, अशीच खात्री गडकरी देत होते. परंतु या दोघांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. याच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे बडे नेते व साखरसम्राट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.राष्ट्रवादीमुळेच मंत्रीपद नाही ?लोकसभा निवडणुकीत महायुतीतून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी भाजपने युती तोडल्याने नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला. आता केंद्रासह राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले आहे, मात्र सदाभाऊ व शिवाजीराव नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळात सात ते आठ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. त्यामध्ये शिवसेनेला २ व भाजपला ६ अशी विभागणी होणार आहे. शिराळा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. भाजपमधील कोअर कमेटीतील सदस्यांचा आदर ठेवूनच निर्णय घेतला जातो. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपणास निश्चित संधी मिळणार आहे.- शिवाजीराव नाईक, आमदार, भाजप.