शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या घोषणेचा फुगा फुटणार काय?

By admin | Updated: December 10, 2014 23:45 IST

शिवाजीराव नाईक समर्थक अस्वस्थ : सदाभाऊ खोत यांच्याही मंत्रिपदाची शक्यता धुसर

अशोक पाटील - इस्लामपूर -‘तुम्ही निवडून द्या, कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी’, अशा वल्गना करुन मतांचा जोगवा मागणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेचा फुगा फुटणार काय? अशीच चर्चा वाळवा—शिराळा तालुक्यात आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने, गडकरींच्या त्या घोषणेवर आजही प्रश्नचिन्ह आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवाजीराव नाईक यांचा समावेश न केल्याने त्यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपुरते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांचे सहकार्य घेतले. तेव्हापासून शेट्टी यांनी ‘रात गयी बात गयी’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाईक व खोत यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. शिराळा मतदारसंघात कामेरी हे महत्त्वाचे गाव मानले जाते. या गावाच्या भूमिकेवरच शिराळ्याचा आमदार ठरतो. याच गावात शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत त्यांनी, ‘नाईक यांना विजयी करा, त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी’, अशी घोषणा केली होती. या त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून येथील जनतेने शिवाजीराव नाईक यांना मतदान करुन विजयी केले. मतदारांनी त्यांचे काम केले, परंतु गडकरी यांनी मात्र त्यांचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांच्या समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्याने शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला. याच पार्श्वभूमीवर नाईक आणि खोत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार, अशीच खात्री गडकरी देत होते. परंतु या दोघांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. याच्या पाठीमागे राष्ट्रवादीचे बडे नेते व साखरसम्राट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.राष्ट्रवादीमुळेच मंत्रीपद नाही ?लोकसभा निवडणुकीत महायुतीतून खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक एकत्रित होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी भाजपने युती तोडल्याने नाईक यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. तरीसुध्दा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे आपला पाठिंबा शिवाजीराव नाईक यांना दिला होता, तर भाजपनेही राज्यभर प्रचार करण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर केला. आता केंद्रासह राज्यातही भाजपचे सरकार स्थापन झाले आहे, मात्र सदाभाऊ व शिवाजीराव नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळात सात ते आठ आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. त्यामध्ये शिवसेनेला २ व भाजपला ६ अशी विभागणी होणार आहे. शिराळा मतदारसंघातून सर्वसामान्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. भाजपमधील कोअर कमेटीतील सदस्यांचा आदर ठेवूनच निर्णय घेतला जातो. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपणास निश्चित संधी मिळणार आहे.- शिवाजीराव नाईक, आमदार, भाजप.