शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

गद्दार राजकारण्यांना मातीत गाडू

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

संजयकाका पाटील : नांगोळे येथील कार्यक्रमात टीका; शालेय कार्यक्रम बनला राजकीय अड्डा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकारणात गद्दारी व दलालशाही फोफावली आहे. या फोफावलेल्या गद्दारीला व दलालशाहीला मातीत गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आज (शनिवारी) खासदार संजयकाका पाटील यांनी दिला. नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आदर्श विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे होते. कार्यक्रम शालेय असला तरी त्याला स्वरूप मात्र राजकीय आले. खासदार पाटील म्हणाले की, तालुक्यात माजी राज्यमंत्री घोरपडे यांनी काही कार्यकर्त्यांना नेते केले. नेत्यांचे पदाधिकारी केले. त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु या राजकीय कृतघ्न दलालांनी स्वार्थाचे राजकारण केले व घोरपडेंच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा राजकीय गद्दारांना भविष्यात गाडल्याशिवाय उसंत घेणार नाही. जनतेनेही अशा राजकीय गद्दारांना त्यांची जागा दाखवावी. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. घोरपडे यांनी भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आर. आर. पाटील तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडत खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, लोकशाहीला अर्थकारण व भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. राजकारणात ज्यांच्याकडे पैसा असेल, त्यानीच राजकारण करायचे का? मग जनतेसाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे काय? सध्याच्या राजकारणात पैशावर जनता मते विकू लागली आहे. त्यामुळे राजकारणातली सौदेबाजी सुरू झाली आहे. हे लोकशाहीला मारक आहे. अशा राजकीय सौदेबाजीतून चुकीची माणसे जनता निवडते, त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. ते तसेच राहतात. त्यामुळे जनतेनेही पैशाच्या राजकारणाला बळी पडू नये. घटनेने दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या मताधिकाराचा योग्य वापर करून योग्य माणसेच राजकारणात पाठवावीत. मी साधा आमदार नसतानाही डोंगराएवढी उपसा सिंचन योजना पूर्ण केली, परंतु तब्बल १२ वर्षे गृहमंत्रीपद भोगणाऱ्यांना साधी आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे व शेतकऱ्यांचे नुकसान आहे. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्यांनी काय बघून, कोणते गुण बघून यांना बारा वर्षे गृहमंत्री केले? केवळ दलालांना पोसण्याचा व सर्वसामान्य जनतेला फसविण्याचा उद्योग त्यांनी केला. गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार पाटील व घोरपडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. आदर्श विद्यामंदिराचे सचिव हणमंतराव मासाळ यांनी स्वागत केले, तर मुख्याध्यापक तुकाराम मासाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे कवठेमहांकाळचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांचेही भाषण झाले. जि. प. सदस्य तानाजी यमगर, मिलिंद कोरे, रावसाहेब कोळेकर, सुखदेव पाटील, प्रशांत घुळी, राहुल कारंडे, रणजित घाडगे, खंडू होवाळ, पप्पू शिंदे उपस्थित होते. अजितराव घोरपडेंची राष्ट्रवादीवर टीका ४यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील माझा पराभव केवळ राजकीय सौदेबाजीमुळे, विरोधकांनी पैशाचा वापर केल्यामुळे झाला आहे. मताला हजारावर दर देऊन व जेवणावळी घालून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला, असा सवाल अजितराव घोरपडे यांनी केला. ४तालुक्यात काही राजकीय दलाल दुकानदारी चालू ठेवण्यासाठी राजकारणात वाकडा पाय टाकत आहेत व सर्वसामान्य माणसांना वेठीस धरत आहेत. अशा राजकीय दलालांचा पाय कायमचा वाकडा केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. या दलालांनी सर्वसामान्य माणसांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे थांबवावे अन्यथा या दलालांना कायमचे जालीम औषध आपण देऊ, असा इशाराही त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.