शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

जी. एम. बियाणाला विरोध करणारे औषध कंपन्यांचे एजंट

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

सुरेश पाटील, अजित नरदे : सांगलीत गुरुवारी शेतकरी परिषद

सांगली : दुष्काळ आणि औषध, रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यासाठी केंद्र शासनाने जनुक बदललेले (जी. एम.) बियाणे लागवडीस परवानगी दिली पाहिजे. भारतामध्ये काही ठराविक बड्या औषध कंपन्यांच्या हितासाठी जनुकसंस्कारित लागवडीवर बंदी घातली आहे, अशी टीका राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश पाटील व शेतकरी संघटनेचे अजित नरदे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रश्नावर आदगोंडा बाबगोंडा पाटील कृषी प्रबोधन मंचतर्फे गुरुवार, दि. १ रोजी सांगलीत सकाळी १० वाजता शेतकरी परिषद आयोजित केली आहे. खासदार आणि कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतीचे उत्पादन वाढले तर, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकरी सध्या जे बियाणे वापरत आहे, ते कालबाह्य झाले आहे. सध्या वापरत असलेल्या बियाणांमुळे एकरी दहा ते बारा टन मका बियाणाचे उत्पादन होत आहे. परंतु, जनुकसंस्कारित बियाणांचा वापर केल्यास एकरी तीस ते चाळीस टन उत्पादन मिळणार आहे. दर कमी मिळाला तरीही उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा कमी होणार आहे. बीटी कापूस बियाणाची भारतात लागवड होत असून, त्यावर किडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे कीटकनाशक औषध फवारणीचा खर्च ८० टक्के वाचला आहे. बीटी वांगी, मका, ज्वारी, गहू, टोमॅटो, बटाटे या पिकांमध्ये जनुकसंस्कारिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उत्पादनही वाढल्याचे सिध्द झाले आहे. ते म्हणाले की, हा भाजीपाला व अन्न खाल्ल्यामुळे माणसाला कोणताही धोका नसल्याचे जगातील ११० नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. अनेक राष्ट्रांमध्ये आणि विशेषत: अमेरिकेमध्येही जनुकसंस्कारित बियाणांचा वापर करून शेती केली जात आहे. कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनुकसंस्कारित पिकांच्या व्यावसायिक लागवडीस विरोध केला आहे. (प्रतिनिधी) लोकसभेत आवाज उठविण्याची मागणी जी. एम. बियाणाचा वापर करण्यासाठी खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, खा. धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवावा, अशी मागणी परिषदेत करणार आहे. यासाठी तीनही खासदारांना शेतकरी परिषदेला बोलाविले आहे. याशिवाय, पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार, अजित नरदे, डॉ. पारखी, विजय निवळ हे कृषितज्ज्ञ शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.