शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासासाठी भविष्याचा विचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० ...

इस्लामपूर : गावांची वाढ झपाट्याने होत असून त्यातून नवनवीन प्रश्नही समोर येत आहेत. आता गावात विकासकामे करताना पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकासकामे करावी लागतील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले.

साखराळे (ता. वाळवा) येथे ९२ लाख रुपयांच्या सहा रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्या रंजना माने, आनंदराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, या परिसरात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या संधीचा लाभ जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अद्ययावत करीत आहोत. रेशन कार्डाचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅम्प घेतले. जातीचे दाखले व आता जात पडताळणीचे दाखले शाळेत देण्याची व्यवस्था केली आहे. धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वाकुर्डे बुद्रुक २ चे पाणी तालुक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नवा सभा मंडप बांधून विरंगुळा केंद्रही करू.

सरपंच बाबूराव पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी डांगे, राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, दिनकर धोंडी पाटील, सुबराव डांगे, आनंदराव दवणे, विश्वास माने, प्रताप पाटील, शैलेंद्र सूर्यवंशी, बळवंत माने, वंदना पाटील, अलका माने, एस. व्ही. पाटील उपस्थित होते. उपसरपंच तजमूल चौगुले यांनी आभार मानले.

फोटो : ०५ इस्लामपूर ३

ओळ : साखराळे (ता. वाळवा) येथे रस्त्याच्या कामाचा प्रारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, रंजना माने, बाबूराव पाटील, तजमूल चौगुले उपस्थित होते.