शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नगरपंचायतींना निधीची उपलब्धता करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST

सांगली : जिल्ह्यातील नागरी भागात समस्यांची सोडवणूक करत त्याठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषद ...

सांगली : जिल्ह्यातील नागरी भागात समस्यांची सोडवणूक करत त्याठिकाणी सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषद असलेल्या शहरात विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत प्रस्ताव आल्यानंतर तातडीने त्याची उपलब्धता करून दिली जाईल, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगलीत दिले.

जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये सुरू असलेली विकासकामे व त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आमदार अनिल बाबर, सुमनताई पाटील उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत अथवा नगरपरिषद झाल्याने या शहरांचा विकास होत आहे. सध्या काही शहरात नागरी समस्या जाणवत असल्या तरी त्याची तातडीने सोडवणूक करण्यास प्रशासन प्राधान्य देणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरी भागाला विकासकामांसाठी निधीची उपलब्धता करून देण्यासाठी मागे पडणार नाही. काही शहरातील पाणी पुरवठा योजनांची कामे रखडली आहेत, तर काही तांत्रिक कारणाने सुरू झाली नाहीत, याठिकाणी तातडीने कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यात येईल.

यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी पलूस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या; तर विटा व तासगाव येथील पाणीपुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात आला.