शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:10 IST

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान ...

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाºयांना किमान वेतन लागू करावे, पगारामधील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन जात कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली.आयटकचे रमेश सहस्रबुध्दे म्हणाले, प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांत अस्वस्थता आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाºयांनीही मनोगत व्यक्त करत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात किमान वेतनची अंमलबजावणी करा, पगारातील गैरसमज काढण्यासाठी बैठक बोलवावी, भविष्य निर्वाह निधी न भरणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, सेवा पुस्तके अद्ययावतपणे भरून द्यावीत, कर्मचाºयांना ओळखपत्र मिळावीत, कर्मचाºयांचा वर्ग तीन व चारमध्ये समावेश करावा, वेतनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब झुरे, सचिव अ‍ॅड. राहुल जाधव, ए. के. कुलकर्णी, यल्लाप्पा कोळी, किरण आरते, संतोष मुळीक, पांडुरंग पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.