शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

इस्लामपुरात हमीभावासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:07 IST

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह ...

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिला.वाळवा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर आला. तेथे जाहीर सभा झाली. सभेनंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तहसीलदार नागेश पाटील यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.संग्रामसिंह पाटील म्हणाले, मुबलक पाणी असतानाही विजेचे लोडशेडिंग सुरु आहे. विजेबरोबरच तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेली ३ वर्षे १५ डिसेंबरपूर्वी खड्डे मुजवणार असल्याची घोषणा करतात. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवून घेणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शासनात बसून भूलथापा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सामान्य जनतेला कंगाल केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधात असताना टाळ वाजवून शेतकºयांसाठी आंदोलन करत राज्यभर फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना शेतकºयांचा विसर पडला आहे.माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी लाभार्थी’ जाहिरातीतून शासनाची लबाडबाजी सुरु आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या; मात्र त्याची जाहिरातबाजी केली नाही. शेतकºयांच्य कर्जमाफीला ४ महिने झाले. दिवाळी गेली तरी अजून १ पैसाही जमा झालेला नाही.आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिव हुलवान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कार्तिक पाटील, क्रांतिप्रसाद पाटील, उदय शिंदे, गुरुराज माने, विशाल पवार, उमेश पवार, अमोल गुरव, विशाल सूर्यवंशी, मनोज पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप