शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शैक्षणिक धोरणातील वारंवार बदलाने खासगी शिकवणी वर्गाकडे विद्यार्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST

माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. ...

माध्यमिक विद्यार्थ्याना पूर्वी इंग्रजी, गणित या विषयासाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयासाठी शिकवणीची आवश्यकता होती. मात्र गेल्या पंधरा वर्षांत परीक्षा पद्धतीत बदल होऊन केवळ लिहिता-वाचता येत असलेले विद्यार्थीही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत.

पाच-सहा वर्षापूर्वी विद्यार्थांना अभियांत्रिकी शिकवणीची गरज होती. मात्र तंत्रशिक्षण विभागाने केवळ प्रात्यक्षिकांच्या गुणावर उत्तीर्ण करण्याचे धोरण आणल्याने अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण होणे सामान्य विद्यार्थांनाही शक्य झाले. यामुळे अभियांत्रिकीचे शिकवणी वर्ग बंद पडत आहेत.

सध्या कोरोनाकाळात विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीत ५० गुणांची प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. ऑनलाइन परीक्षा घरातून देताना विद्यार्थी पुस्तकाचा आधार किंवा सहकाऱ्यांची मदत घेऊ शकेल. त्यामुळे विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्याला शिकवणीला जाण्याची गरज राहिली नाही. कॉमर्स क्षेत्रात किंवा इंग्रजी विषयासाठी शिकवणीचीही आता विद्यार्थ्याना गरज नाही. ऑनलाइन शिकवणीचा लाभ घेणारे विद्यार्थी फी देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शिकवणीचालकांची परिस्थिती कठीण होत आहे. इयत्ता नववीपर्यंत विद्यार्थांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे नववीपर्यंत शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या घटली आहे. एकंदरीत दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा असल्याने पन्नास टक्केच विद्यार्थी शिकवणीला जात आहेत. दहावी बोर्ड परीक्षा व बारावीची वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची गरज असल्याने या संबंधित शिकवणी वर्गाना चांगला प्रतिसाद आहे. मात्र विद्यार्थांअभावी पहिली ते नववीपर्यंत व बारावीनंतर पुढील पदवीच्या शिकवणी वर्गाची अवस्था बिकट आहे. संपूर्ण राज्यात खासगी शिकवणी वर्गचालक अडचणीत आले आहेत. ही बाब शासनाने लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात वारंवार बदल करणे थांबवावे, असेही मत डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले.