शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ई-पाससाठी माल वाहतूकदारांचा पोलिसांकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

सांगलीत रविवारी विश्रामबाग पोलिसांनी ट्रकचालकाला ई-पास नसल्याचे सांगत ५०० रुपये दंड ठोठावला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माल वाहतुकीसाठी ...

सांगलीत रविवारी विश्रामबाग पोलिसांनी ट्रकचालकाला ई-पास नसल्याचे सांगत ५०० रुपये दंड ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : माल वाहतुकीसाठी ई-पास गरजेचा नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही पोलिसांकडून अडवणूक सुरु आहे. ट्रक चालकांकडून ५०० ते १००० रुपयाच्या पावत्या फाडल्या जात आहेत.

लॉकडाऊन काळात वाहतूक मंदावल्याने अन्न-धान्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती

आभाळाला भिडत आहेत. यावर नियंत्रणासाठी शासनाने माल वाहतुकीला मोकळीक दिला आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या वाहनांना ई-पास गरजेचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. अगदी देशभरात कोठेही वाहतूक करता येते. सांगली पोलिसांना मात्र या आदेशांची माहिती नसावी असे दिसत आहे.

रविवारी (दि. २३) मुंबईहून सांगलीला माल घेऊन आलेल्या ट्रकचालकाला (एमएच १०, सीएल २८७२) विश्रामबाग पोलिसांनी अडवून धरले. मिरजेला व्यापाऱ्याच्या गोदामाकडे माल घेऊन जात असताना सांगलीत बाजार समितीसमोर ट्रक अडवला. ई-पास नसल्याबद्दल दमबाजी केली. माल वाहतुकीसाठी त्याची गरज नसल्याचा खुलासा चालक नौशाद पिरजादे यांनी केला, परंतु पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पिरजादे यांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन लावला, पण तोदेखील पोलिसांनी घेतला नाही. ५०० रुपयांची पावती करण्यास भाग पाडले. ती केल्यानंतरच ट्रक सोडला. पावतीवर कोरोनाचा उल्लेख केला, पण कोणत्या नियमाचा भंग केला याचा उल्लेख मात्र टाळला. पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार वाहतूकदारांनी केली आहे.

कोट

वाहनचालकांची पोलीस अडवणूक करत असल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. माल वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या ई-पासची गरज नसल्याचे शासनाने व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यास वाहनचालकांनी वाहतूकदार संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, सांगली जिल्हा माल वाहतूकदार संघटना