मिरज परिसरातील महादेव कोरे यांच्यासह पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया प्रा. लि. यांना शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगामात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ऊस गाळपास पाठविला आहे. ऊस गाळपास आल्यानंतर एफआरपीप्रमाणे ऊस बिल १४ दिवसांचे आत देणे बंधनकारक आहे. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कारखान्याकडून गाळप झालेल्या ऊसबिलाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. कारखाना चालकांनी जाणूनबुजून वैधानिक आधारभूत किमतीप्रमाणे ऊसबिलाप्रमाणे रक्कम न देता कायद्याचा अवमान व शेतकऱ्यांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मिलिंद खाडिलकर, गोपाळ खाडिलकर, मकरंद खाडिलकर, महादेव कोरे, सचिन कोरे (रा. मिरज) यांनी दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, प्रिया रूपारेल, मुख्य कार्यकारी अधिकारी मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापकीय संचालक शरद मोरे (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध सांगलीतील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याविरुद्ध फसवणूकप्रकरणी न्यायालयात फाैजदारी खटला दाखल केला आहे.
एफआरपीप्रमाणे ऊस बिल न देता फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST