शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:24 IST

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपात गेले, ते घाबरून गेलेले आहेत. पक्षावर निष्ठा असणारा, खा. शरद पवारांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासमवेत आहे. दीड-दोन महिन्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बोलावून पक्षाचे शिबिर घेऊ, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आटपाडी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.टेंभू योजनेच्या निधीबद्दल विधानसभेत आवाज उठविण्याबरोबरच कृष्णा व कोयना नद्यांतून वाहून जाणारे पुराचे पाणी तातडीने उचलून आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील कल्लेश्वर मंदिर हॉलमध्ये आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवक, महिला, विद्यार्थी यांसह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आ. पाटील यांच्याहस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्षा स्वप्नील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. हे शासन बेजबाबदार आहे. काही तरी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे आरक्षण देणाऱ्या सरकारला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षणही प्रलंबित आहे. नोटाबंदीने आपल्या परिसरातील डाळिंबासह शेतीमालाचे दर कोसळले असून, जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.यावेळी सौ. छाया पाटील, बाबासाहेब मुळीक, भरत देशमुख, स्वप्नील जाधव, नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष निखिल दिवटे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष सागर काळे, अ‍ॅड. अजित वसेकर सादिक खाटिक यांचीही भाषणे झाली.तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दुष्काळी भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून आम्हास न्याय द्या, ताकद द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, पं. स. सदस्या सौ. उषाताई कुठे, किसन जानकर, कल्लाप्पा कुठे, भाऊसाहेब देशमुख, रणजित देशमुख, रोहित देशमुख, शरद नांदुगडे, जालिंदर कात्रे, रमेश मोरे, अनिल ऐवळे, माणिक पांढरे, संपतराव पाटील, अविनाश बनसोडे, साहेब कदम, ईश्वरा ऐवळे, रियाज शेख, राघो रणदिवे, नितीन माळी उपस्थित होते.त्यांना विसरणार नाही विलासराव शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही मागेल ते-ते दिले, तीच मंडळी ऐन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमचा पक्ष सोडून गेली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची लाज राखण्याचे काम केले आहे. आम्ही आपणास कधीही विसरणार नाही.