शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:24 IST

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपात गेले, ते घाबरून गेलेले आहेत. पक्षावर निष्ठा असणारा, खा. शरद पवारांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासमवेत आहे. दीड-दोन महिन्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बोलावून पक्षाचे शिबिर घेऊ, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आटपाडी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.टेंभू योजनेच्या निधीबद्दल विधानसभेत आवाज उठविण्याबरोबरच कृष्णा व कोयना नद्यांतून वाहून जाणारे पुराचे पाणी तातडीने उचलून आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील कल्लेश्वर मंदिर हॉलमध्ये आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवक, महिला, विद्यार्थी यांसह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आ. पाटील यांच्याहस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्षा स्वप्नील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. हे शासन बेजबाबदार आहे. काही तरी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे आरक्षण देणाऱ्या सरकारला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षणही प्रलंबित आहे. नोटाबंदीने आपल्या परिसरातील डाळिंबासह शेतीमालाचे दर कोसळले असून, जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.यावेळी सौ. छाया पाटील, बाबासाहेब मुळीक, भरत देशमुख, स्वप्नील जाधव, नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष निखिल दिवटे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष सागर काळे, अ‍ॅड. अजित वसेकर सादिक खाटिक यांचीही भाषणे झाली.तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दुष्काळी भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून आम्हास न्याय द्या, ताकद द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, पं. स. सदस्या सौ. उषाताई कुठे, किसन जानकर, कल्लाप्पा कुठे, भाऊसाहेब देशमुख, रणजित देशमुख, रोहित देशमुख, शरद नांदुगडे, जालिंदर कात्रे, रमेश मोरे, अनिल ऐवळे, माणिक पांढरे, संपतराव पाटील, अविनाश बनसोडे, साहेब कदम, ईश्वरा ऐवळे, रियाज शेख, राघो रणदिवे, नितीन माळी उपस्थित होते.त्यांना विसरणार नाही विलासराव शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही मागेल ते-ते दिले, तीच मंडळी ऐन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमचा पक्ष सोडून गेली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची लाज राखण्याचे काम केले आहे. आम्ही आपणास कधीही विसरणार नाही.