शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:24 IST

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपात गेले, ते घाबरून गेलेले आहेत. पक्षावर निष्ठा असणारा, खा. शरद पवारांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासमवेत आहे. दीड-दोन महिन्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बोलावून पक्षाचे शिबिर घेऊ, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आटपाडी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.टेंभू योजनेच्या निधीबद्दल विधानसभेत आवाज उठविण्याबरोबरच कृष्णा व कोयना नद्यांतून वाहून जाणारे पुराचे पाणी तातडीने उचलून आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील कल्लेश्वर मंदिर हॉलमध्ये आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवक, महिला, विद्यार्थी यांसह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आ. पाटील यांच्याहस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्षा स्वप्नील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. हे शासन बेजबाबदार आहे. काही तरी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे आरक्षण देणाऱ्या सरकारला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षणही प्रलंबित आहे. नोटाबंदीने आपल्या परिसरातील डाळिंबासह शेतीमालाचे दर कोसळले असून, जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.यावेळी सौ. छाया पाटील, बाबासाहेब मुळीक, भरत देशमुख, स्वप्नील जाधव, नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष निखिल दिवटे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष सागर काळे, अ‍ॅड. अजित वसेकर सादिक खाटिक यांचीही भाषणे झाली.तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दुष्काळी भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून आम्हास न्याय द्या, ताकद द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, पं. स. सदस्या सौ. उषाताई कुठे, किसन जानकर, कल्लाप्पा कुठे, भाऊसाहेब देशमुख, रणजित देशमुख, रोहित देशमुख, शरद नांदुगडे, जालिंदर कात्रे, रमेश मोरे, अनिल ऐवळे, माणिक पांढरे, संपतराव पाटील, अविनाश बनसोडे, साहेब कदम, ईश्वरा ऐवळे, रियाज शेख, राघो रणदिवे, नितीन माळी उपस्थित होते.त्यांना विसरणार नाही विलासराव शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही मागेल ते-ते दिले, तीच मंडळी ऐन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमचा पक्ष सोडून गेली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची लाज राखण्याचे काम केले आहे. आम्ही आपणास कधीही विसरणार नाही.