शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

मिरजेत गॅस्ट्रोने घेतला चौथा बळी

By admin | Updated: November 23, 2014 23:52 IST

वृद्धेचा मृत्यू : आणखी ३७ रुग्ण दाखल

मिरज : मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे सुहासिनी भालचंद्र जोग (वय ७०) या वृद्धेचा आज, रविवारी मृत्यू झाला. गॅस्ट्रोमुळे चार दिवसांत चौघांचा बळी गेला असून, जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालकांनी आज मिरजेत रुग्णांची पाहणी केली. महापालिका आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ आटोक्यात असल्याचा दावा केला; मात्र आज आणखी ३७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. मिरजेत गेला आठवडाभर गॅस्ट्रो व कॉलरा साथींची सुमारे तीनशे जणांना लागण झाली आहे. जुलाब व उलट्यांमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, आज ब्राह्मणपुरीतील सुहासिनी जोग यांचा मूत्यू झाला. जोग या घरी एकट्याच राहत होत्या. उलट्या व जुलाबामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जोग यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. आजही उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल झाले. गॅस्ट्रोबाधित रुग्णांची संख्या मोठी असल्याने महापालिका प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकतज्ज्ञांना मदतीसाठी पाचारण केले आहे. जिल्हा परिषद व वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकतज्ज्ञांकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, आरोग्य उपसंचालक डॉ. मुगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दळवी यांनी मिरजेत गॅस्ट्रोबाधित रुग्णांची पाहणी करून साथ नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरात दूषित पाण्याचा पुरवठा बंद करण्यासाठी पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. ब्राह्मणपुरीतील मुख्य जलवाहिन्यांतील दूषित पाणी काढण्यात येत होते. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उद्या, सोमवारी त्या पाण्याच्या शुद्धतेचा अहवाल मिळणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. ब्राह्मणपुरी परिसरात गॅस्ट्रो साथीची तीव्रता जास्त आहे. या परिसरातील दोन वृद्धांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.अफवांमुळे गोंधळगॅस्ट्रोची साथ नियंत्रणात नसल्याने पाणीपुरवठ्याबाबत शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी तेथे धाव घेतली. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले. दूषित पाण्यामुळे बाटली बंद पाण्याला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने बाटली बंद पाण्याचे दर वाढले आहेत.