शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शालेय पटसंख्येत चार हजाराने वाढ

By admin | Updated: May 7, 2016 00:58 IST

शिक्षण समिती सभा : शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी कोटीचा निधी

सांगली : नवीन शैक्षणिक वर्षासाठी गुढीपाडव्यापासून सुरु झालेल्या शाळा प्रवेशात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी समाधानकारक बातमी असून, जिल्ह्यात पटसंख्येत चार हजारने वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, शाळा इमारतीच्या नवीन बांधकामासाठी ५० लाख, तर इमारत दुरुस्तीसाठी ५० लाख असा एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली. शिक्षण समितीच्या सभेत सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात चार हजार नवीन विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीकडून शाळा इमारत बांधकामासाठी ५० लाख, तर दुरुस्तीसाठी ५० लाख असा एक कोटीचा निधी प्राप्त झाल्यानंतर या निधीच्या विनियोगासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्या यादीला सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हापातळीवर घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्तीचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचा निर्णय घेण्यात आला. आयएसओ मानांकनाच्या धर्तीवर शासनाच्या समृध्द शाळा योजनेंतर्गत ‘शाळा सिध्दी २०१६’ मध्ये १३६ केंद्रांतून किमान एका शाळेला मानांकन मिळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सुरेश मोहिते, मीनाक्षी महाडिक, गजानन कोठावळे, सुहास शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सांगली : जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्यात अशी परीक्षा घेणारी ही एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. दरम्यान, या परीक्षेचा चौथीचा निकाल ६८ टक्के, तर सातवीचा निकाल ७३ टक्के लागला आहे. लवकरच यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वीय निधीच्या सहकार्यातून इयत्ता चौथी व इयत्ता सातवीसाठी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात ४ थी परीक्षेसाठी २४ हजार ५३३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १६ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६८.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच ७ वी परीक्षेसाठी १० हजार ३४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ७ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सातवीचा ७३.७१ टक्के निकाल लागला आहे. ४ थी च्या परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे : प्रथम : आसिया तारीश आत्तार ( वांडरेवस्ती शाळा), पृथ्वीराज प्रवीण पाटील (शाळा नं. १ कुची), शिवराज नवाळे (शाळा नं. १ दिघंची), सुजित देशमुख (शाळा नं. १ दिघंची), ऋतुजा पाटील (नागाव नि.), द्वितीय : समीक्षा धने (नेहरुनगर), यश झांबरे (बागमळा, डोंगरसोनी), तृतीय : विश्वजित बंडगर (सरस्वतीनगर), आदित्य कांबळे (वांडरेवस्ती), अथर्व कुडचे (इंगळे खोरा, मुळीक वस्ती), वनिता माळी (इंगळे खोरा, मुळीक वस्ती), विराज चव्हाण (य.पा.वाडी).सातवी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रथम : गायत्री पाटील (नेहरुनगर), द्वितीय : सोनाली पाटील (नागाव नि.), वैशाली पाटील (आरवडे), तृतीय : सानिका जगदाळे , प्राची पाटील (नेहरुनगर). या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)