२०१५ ते २०२० या कालावधीत निवडणूक बिनविरोध करून माजी उपसरपंच रावसाहेब पाटील व बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग यमगर यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून गावामध्ये भौतिक सुविधा निर्माण केल्या. अंतर्गत रस्ते, घरकुल, विविध योजनांवर भर दिला. याचाच फायदा या निवणुकीत झाला व भरघोस मतांनी हे पॅनेल विजयी झाले. स्वतः रावसाहेब पाटील ५७६ मताधिक्याने विजयी झाले. याचीच पावती म्हणून रावसाहेब पाटील यांची सरपंचपदी, तर हारुबाई यमगर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांमध्ये पांडुरंग रामा यमगर, शिवाजी दादू यमगर, संदीप दत्तू यमगर, सोनाबाई मारुती शिंगाडे, सुभद्रा दत्तू यमगर, वंदना साहेबराव यमगर, लक्ष्मी दिलीप साबळे यांचा समावेश आहे.
फाेटाे : १३ रावसाहेब पाटील
फाेटाे : १३ हारुबाई यमगर