शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:10 IST

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली. पण सोमवारपासून पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या २४ तासात ४५ मिलिमीटर पावसासह एकूण १८४२ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले केले. मात्र दुपारपर्यंत पाणी वाढल्याने दुपारी अडीच वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला.

धरण सोमवारी दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी पाणी बाहेर सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले, तर विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या काठावरील लोकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ५ आॅगस्टला खुले केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक होते. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस उशिराने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाणी बाहेर सोडले जात आहे.

२०१५ चा अपवाद वगळता दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, कºहाड या तालुक्यांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबत कधीही तुटवडा जाणवलेला नाही.