शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:10 IST

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली. पण सोमवारपासून पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या २४ तासात ४५ मिलिमीटर पावसासह एकूण १८४२ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले केले. मात्र दुपारपर्यंत पाणी वाढल्याने दुपारी अडीच वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला.

धरण सोमवारी दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी पाणी बाहेर सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले, तर विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या काठावरील लोकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ५ आॅगस्टला खुले केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक होते. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस उशिराने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाणी बाहेर सोडले जात आहे.

२०१५ चा अपवाद वगळता दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, कºहाड या तालुक्यांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबत कधीही तुटवडा जाणवलेला नाही.