शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:10 IST

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली. पण सोमवारपासून पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या २४ तासात ४५ मिलिमीटर पावसासह एकूण १८४२ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले केले. मात्र दुपारपर्यंत पाणी वाढल्याने दुपारी अडीच वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला.

धरण सोमवारी दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी पाणी बाहेर सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले, तर विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या काठावरील लोकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ५ आॅगस्टला खुले केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक होते. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस उशिराने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाणी बाहेर सोडले जात आहे.

२०१५ चा अपवाद वगळता दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, कºहाड या तालुक्यांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबत कधीही तुटवडा जाणवलेला नाही.