शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे ...

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली. यंदा मात्र तशी स्थिती नाही. लांबलेल्या पावसाने छाटण्या खोळंबून सुमारे २० टक्के बागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षे मुबलक नाहीत. कोरोनावर आरोग्यदायी म्हणून मागणीही चांगली आहे. साहजिकच चांगला दर मिळत आहे.

चौकट

पहिल्याच टप्प्यात दणकेबाज दर

सध्या सुपर सोनाकाला चार किलोच्या पेटीला ३५० ते ४१० रुपये दर मिळत आहे. आरके ३७० ते ४२०, अनुष्का ४०० ते ४२०, मिडीयम सुपर ३२० ते ३५० असा दणदणीत दर आहे. शरदला चक्क ५५० ते ६०० रुपये दर मिळत आहे.

चौकट

कटल्याविरोधात बागायतदार आक्रमक

निर्यातीच्या द्राक्षांमध्ये ७ टक्के कटला घेतला जातो. म्हणजे एकूण द्राक्षांपैकी ७ टक्के खराब म्हणून काढली जातात. घट-तुटीच्या नावाखाली कमी पैसे दिले जातात. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यातीच्या बागा व्यापाऱ्याकडे उतरणीसाठी देण्यापूर्वी शेतकरी स्वत:च खराब माल बाजूला काढतात, तरीही प्रत्यक्ष हार्वेस्टिंगवेळी पुन्हा ७ टक्के कटला घेतात. अशा व्यापाऱ्यांना हार्वेस्टिंग करु देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. हार्वेस्टिंग करणारी टोळी प्रत्येक गाडीमागे ५०० ते २००० रुपयांची खुशाली घेते. अशा कंपन्या अथवा व्यापाऱ्यांना माल देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोट

सात टक्के कटल्यामुळे निर्यातीच्या द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेचाच दर मिळतो. बागेसाठी लाखो रुपये खर्चानंतरही भुर्दंड सोसावा लागतो.

- नागेश कुंभार, बागायतदार, सावळज

कोट

घट, तूट आणि चांगल्या मालाच्या नावाखाली कटला घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांची थेट लूट होते. निर्यातीसाठी जिवापाड जपलेल्या बागेतील मालाची नासाडी होते.

- अनिल माळी, बागायतदार, सावळज