शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नाशिकला निघालेले चाळीस प्रवासी एसटीसह तासभर वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST

सांगली : प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून मिरज आगाराची एसटी तासभर अडवून ठेवल्याचा प्रकार तासगाव स्थानकात घडला. यामुळे प्रवासी वेठीस धरले ...

सांगली : प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून मिरज आगाराची एसटी तासभर अडवून ठेवल्याचा प्रकार तासगाव स्थानकात घडला. यामुळे प्रवासी वेठीस धरले गेले. विभाग नियंत्रकांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रवासी आणि एसटीची सुटका झाली.

या घडामोडींमध्ये चालक - वाहकावर अरेरावीचा प्रकारही घडला असून, याची चौकशी केली जाणार आहे. सांगली - मिरजेसह पूर्व भागातून पुण्याकडे जाणारी सर्व एसटी वाहतूक पुरामुळे सध्या तासगावमार्गे सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या गाड्या जाताना तासगावमधील प्रवासीही नेतात. यामुळे तासगाव आगाराच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यातूनच मंगळवारी दुपारी संघर्ष पेटला. अधिकारीच अरेरावीवर आले. मिरज आगाराची एसटी नाशिकला निघाली असता तासगावमध्ये काही प्रवासी चढले. हे दिसताच स्थानकातील अधिकाऱ्यांनी गाडी रोखून धरली. तासगावचे प्रवासी घेतल्याबद्दल आक्षेप घेतला. चालक - वाहकांसोबत वाद पेटला. सुमारे तासभर हा संघर्ष सुरू होता. एसटीतील प्रवासी वेठीस धरले गेले. चालक - वाहकांच्या अंगावर जाण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे प्रवाशांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली.

चालक - वाहकांनी हा प्रकार मिरज आगार प्रमुखांना कळवला. त्यांच्या सुचनेनुसार विभागीय नियंत्रक अरुण वाघाटे यांना माहिती दिली. वाघाटे यांनी तासगावच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. एसटी अडवून धरल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर गाडी सोडण्यात आली. तासाभराच्या विलंबाने गाडी पुढे मार्गस्थ झाली. खासगी वडाप गाड्यांसोबत एसटीच्या अधिकाऱ्यांचा संघर्ष नेहमी चालतो. पण, खुद्द स्वत:च्या कर्मचाऱ्यांसोबतच हा प्रकार पाहून प्रवासी स्तिमित झाले.

कोट

प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली. तासभर गाडी व प्रवासी अडवून ठेवण्याचा प्रकार योग्य नव्हता.

- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग