शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

सांगलीच्या दुर्गप्रेमींनी सर केले कळसूबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणारे कळसूबाई शिखर सर करण्याची कामगिरी सांगलीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणारे कळसूबाई शिखर सर करण्याची कामगिरी सांगलीतील सह्याद्री व्हेंचर्सच्या दुर्गप्रेमींनी केली. मोहीम फत्ते झाल्यानंतर या दुर्गप्रेमींनी एकच जल्लोष केला.

कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ५४०० फूट (१६४६ मीटर) उंच असणारे हे शिखर सर करणे हे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते.

नुकतेच सांगलीतील सह्याद्री व्हेंचर्स या निसर्ग व दुर्गप्रेमी ग्रुपने कळसूबाई शिखर सर केले. सचिन बावचकर, डॉ. कल्याणी जगदाळे बावचकर, संदीप बावचकर, रोहन गावडे यांनी दुर्गभ्रमंतीसाठी सुरू केलेल्या सह्याद्री व्हेंचर्सने आजपर्यंत अनेक गड किल्ले सर केले आहेत. यातील ही त्यांची महत्त्वाची मोहीम होती.

सह्याद्री व्हेंचर्सच्या ३५ ट्रेकर्सच्या टीमने यात सहभाग घेतला होता. सचिन बावचकर यांनी सांगितले की, सुरुवातीपासून शिखरावर पोहोचेपर्यंत संपूर्ण चढण, थोडीफार निसरडी पायवाट, आडवे असणारे लहान- मोठे दगडगोटे व मध्येच कातळावर येणारा खडा लोखंडी जिना. यावरून चालताना मागे वळून पाहिले की काळजाला धडकीच भरते. सारे काही रोमांचित करणारे होते. काळाकुट्ट अंधार, त्यातच अंगाला झोंबणारी थंडी, असे विलक्षण वातावरण होते. सतत तीन तास पायपीट करून शिखरावर पोहोचल्याचा आनंद खूप मोठा होता.

भंडारदऱ्याचा जलाशय, रतनगड, आजोबा डोंगर, हरिश्चंद्रगड, अलंग मदन कुलंग असा इगतपुरीतील सर्व परिसर शिखरावरून न्याहाळता येतो. हा सर्व अनुभव दुर्गप्रेमींनी घेतला.