शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांवर लवकरच आरोपपत्र

By admin | Updated: May 16, 2015 00:02 IST

जिल्हा बँक घोटाळा : ३८ संस्थांना नियमबाह्य १५७ कोटींचा लाभ; १०४ जणांनी मांडले म्हणणे

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जाचा आणि कर्ज परतफेडीचा ३८ संस्थांना १५७ कोटींचा नियमबाह्य लाभ देऊन बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी माजी संचालक, तत्कालीन अधिकारी आदी १०४ जणांनी शुक्रवारी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडले. सहकार संस्था अधिनियम १९६० कलम ७२ (२) ची अंतिम चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरितांना २५ मेपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे.जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक, अध्यक्ष, माजी कार्यकारी संचालक यांनी नियमबाह्य, विनातारण व मर्यादा ओलांडून २१ संस्थांना कर्जवाटप केले होते. याचबरोबर १७ संस्थांना दिलेल्या कर्ज येणेबाकीतील सूट यामुळे जिल्हा बँकेस १५७ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८३ च्या चौकशीत ठेवला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार दोषींवर जबाबदारी निश्चितीसाठी चौकशी सुरु आहे. माजी संचालक, तत्कालीन कार्यकारी संचालक व मृत माजी संचालकांच्या वारसांसह एकूण १०२ जणांना खुलासे, म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. त्यांचे खुलासे सादर झालेले आहेत.दरम्यान, ३८ संस्थांच्या कर्जप्रकरणी १५७ कोटीच्या नुकसानीवरून माजी संचालकांना सरसकटपणे नुकसानीबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्याला माजी संचालकांतर्फे वकिलांनी आक्षेप घेतला होता. कर्जप्रकरणांची छाननी करावी, ज्या प्रकरणाशी ज्याचा सहभाग आहे, अथवा मंजुरीच्या सभेला जे उपस्थित आहेत, त्यांनाच नोटीस देणे आवश्यक आहे, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून छाननी करून माजी संचालकांना फेरनोटिसा काढल्या. त्यावर शुक्रवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी अधिकारी तथा कऱ्हाडचे उपनिबंधक (सहकारी संस्था) संपतराव गुंजाळ यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संबंधित माजी संचालक, तत्कालीन अधिकारी यांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि खुलासेही स्वीकारले आहेत. यावेळी बँकेला १५७ कोटींचे नुकसान करण्यामध्ये काही माजी संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश नसल्यामुळे त्यांना वगळल्याची खात्रीशीर माहिती आहे. पण, यातून नक्की कुणाला वगळले, याची ठोस माहिती चौकशी अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.या चौकशीनंतर आता सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७२ (३) नुसार दोषी माजी संचालक, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकारी गुंजाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)...तर संचालक पदाला मुकावे लागणारबँकेचे १५७ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणात काही विद्यमान संचालक दोषी दिसत आहेत. या संचालकांवर दोषारोपपत्र निश्चित झाल्यास त्यांना पदाला मुकावे लागणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.काही संचालक मृत झाले असून त्यांच्या वारसांना बाजू मांडण्याची नोटीस बजाविली होती. परंतु, त्यांच्याकडून वेळेत खुलासे सादर झाले नाहीत. म्हणून त्यांच्या वारसांना २५ मेपर्यंत खुलासे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. या कालावधित त्यांनी खुलासे सादर न केल्यास वारसांच्या मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसुली होणार आहे. यामुळे वारसांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.