शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

जंगलांच्या आगी वन्यजीवांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

बाबासाहेब परिट लोकमत न्यूज नेटवर्क बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक ...

बाबासाहेब परिट

लोकमत न्यूज नेटवर्क

बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावत आहेत. परंतु, त्यांचा शोध घेणे वन विभागाला अवघड जात आहे. वणव्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यामुळे बिबटे व गवे लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या वर्षभरात लोकवस्तीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मांगले परिसरात काही बिबट्यांच्या पिलांचा तसेच पूर्ण वाढ झालेल्या एका बिबट्याचा खुजगावच्या जलसेतूवरून पडून मृत्यू झाला. शिराळा तालुक्यात दोन-चार दिवसांनी बिबट्याने शेळी व श्वान मारल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने घडत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे आरक्षित केलेल्या जंगलाव्यतिरिक्त आरळा-गुढे पाचगणी पठार ते शेडगेवाडी फाट्यापर्यंतचा परिसर हा जंगलव्याप्त आहे. पावलेवाडीपर्यंत डोंगरावर बऱ्यापैकी झाडी आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या जंगलांना बिबट्याच्या वावराच्या भीतीपोटी काही नागरिक आगी लावत आहेत. यामुळे बिबट्याचा वावर जंगलापेक्षा शिवारातील ऊसात व नदीकाठावरील परिसरातच जास्त असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्याभरापूर्वी बिऊर परिसरात बिबट्या एका लहान मुलाला घेऊन गेल्याची घटना घडली होती. स्वतःच्या हक्काचा अधिवास माणसाच्या हस्तक्षेपाने उद्ध्वस्त झाल्यामुळे बिबट्या व रानगवे यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. याबाबत जंगलाचे अस्तित्व वाचवणे व वणव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी दीर्घ पल्ल्याचे कॅमेरे बसवण्याची गरज आहे. वणवे लावणार्‍यांवर कारवाई करून नैसर्गिक अधिवास वाढवल्यास रानगवे व बिबट्यांपासून होणारा त्रास थांबणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोट

वणवा लागल्यानंतर जमिनीतील चौदा प्रकारची अन्नद्रव्ये नष्ट होतात. मौल्यवान खाद्य प्रजातीचे गवत नष्ट होते. नैसर्गिकरित्या कंपोस्ट खत निर्मिती थांबते. वणव्यांमुळे अन्नसाखळी तुटते.

- जी. एच. लंगोटे, वनक्षेत्रपाल, चांदोली अभयारण्य.

कोट

वणव्यांमुळे सरपटणारे प्राणी नष्ट होत आहेत. प्रदूषणातही वाढ होत आहे. पक्ष्यांची घरटी नष्ट होऊन मधमाशांची पोळी जळतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

- डी. के. यमगर, वनपाल, चांदोली अभयारण्य.