शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मगरीचे बळी वाढताना वन खात्याचा कागदी खेळ

By admin | Updated: October 21, 2016 01:30 IST

प्राणीमित्रांचा अडसर : ग्रामस्थ संतप्त; सात बळी, तर चाळीसहून अधिक जखमी

सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज कृष्णा नदीत औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत मगरींचा मोठा वावर आहे. यामुळे आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात सातवा बळी गेला असून, चाळीस जण जखमी झाले आहेत. तसेच कित्येक शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांचाही जीव गेला आहे. प्राणी गणनेनुसार या परिसरातीत नदीपात्रात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आहेत. वन विभाग प्रत्येक दुर्घटनेनंतर कागदी घोडे नाचवितो. प्राणीमित्रांचे कारण देतो. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मगरींच्या हल्ल्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न उभा आहे. आतापर्यंत अनिकेत कदम (रा. कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ सप्टेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ मार्च २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) यांचा सातवा, असे मगरबळी गेले आहेत. सुमारे ४० नागरिकांवर मगरींनी हल्ले केले आहेत. पण मोटारी सुरू करणे, वैरण काढणे, जॅकवेल परिसरातील कामे, धुणे धुणे, अंघोळीसाठी अशा विविध कारणांनी नदीवर ग्रामस्थांना जावेच लागते. औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगरींच्या गणनेत १९ मोठ्या व ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. एक मगर एका गर्भारपणात सुमारे ४०-५० पिली देते. यातील चार-पाच जरी प्रौढ झाली तरी, मगरींच्या संख्येचे भीषण वास्तव समोर येते. २००३ मध्ये अनिकेत कदमच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिने पिंजरा लावला होता आणि आता संजय भानुसे यांच्या मृत्यूनंतरही मगर पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पण मगर एकदाही सापडली नाही. त्यामुळे हा नुसताच खेळखंडोबा ठरला आहे. याचदरम्यान काही प्राणीमित्र कायद्याची भीती दाखवत मगर पकडण्यात अडसर करतात. ‘नदीवर लोकांनी जाऊ नये किंवा मगरींचा प्रतिकार करा, ठोसे लावा, डोळा फोडा, पडजीभ दाबा’ यासारखे उपाय मगरीपासून जीव वाचविण्यासाठी ते सांगतात. त्यावेळी ग्रामस्थ ही प्रात्यक्षिके करून दाखविण्याचे आवाहन करतात. काही वेळेला जबाबदारी टाळण्यासाठी प्राणी मित्रांना वन विभागच पुढे करतो का? अशा प्रकारची शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. उदासीनता झाकण्यासाठी वन विभाग असे प्रकार करतो, असा आरोप होत आहे. वन विभागाकडून जखमींकरिता ५० हजार, गंभीर जखमींना एक लाख, तर मृतासाठी आठ लाख मदतीची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे गोळा करताना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ही मदत नक्की मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचविण्यात वनविभाग धन्यता मानत आहे. सध्या नदीला मगर प्रतिबंधित संरक्षक जाळी बसविणे, सर्व्हेतून व प्रस्ताव सादर करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संमती आणि परिपत्रक काढले आहे. पण या जाळीचा उपयोगही किती होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.