शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मगरीचे बळी वाढताना वन खात्याचा कागदी खेळ

By admin | Updated: October 21, 2016 01:30 IST

प्राणीमित्रांचा अडसर : ग्रामस्थ संतप्त; सात बळी, तर चाळीसहून अधिक जखमी

सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज कृष्णा नदीत औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत मगरींचा मोठा वावर आहे. यामुळे आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात सातवा बळी गेला असून, चाळीस जण जखमी झाले आहेत. तसेच कित्येक शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांचाही जीव गेला आहे. प्राणी गणनेनुसार या परिसरातीत नदीपात्रात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आहेत. वन विभाग प्रत्येक दुर्घटनेनंतर कागदी घोडे नाचवितो. प्राणीमित्रांचे कारण देतो. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मगरींच्या हल्ल्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न उभा आहे. आतापर्यंत अनिकेत कदम (रा. कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ सप्टेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ मार्च २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) यांचा सातवा, असे मगरबळी गेले आहेत. सुमारे ४० नागरिकांवर मगरींनी हल्ले केले आहेत. पण मोटारी सुरू करणे, वैरण काढणे, जॅकवेल परिसरातील कामे, धुणे धुणे, अंघोळीसाठी अशा विविध कारणांनी नदीवर ग्रामस्थांना जावेच लागते. औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगरींच्या गणनेत १९ मोठ्या व ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. एक मगर एका गर्भारपणात सुमारे ४०-५० पिली देते. यातील चार-पाच जरी प्रौढ झाली तरी, मगरींच्या संख्येचे भीषण वास्तव समोर येते. २००३ मध्ये अनिकेत कदमच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिने पिंजरा लावला होता आणि आता संजय भानुसे यांच्या मृत्यूनंतरही मगर पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पण मगर एकदाही सापडली नाही. त्यामुळे हा नुसताच खेळखंडोबा ठरला आहे. याचदरम्यान काही प्राणीमित्र कायद्याची भीती दाखवत मगर पकडण्यात अडसर करतात. ‘नदीवर लोकांनी जाऊ नये किंवा मगरींचा प्रतिकार करा, ठोसे लावा, डोळा फोडा, पडजीभ दाबा’ यासारखे उपाय मगरीपासून जीव वाचविण्यासाठी ते सांगतात. त्यावेळी ग्रामस्थ ही प्रात्यक्षिके करून दाखविण्याचे आवाहन करतात. काही वेळेला जबाबदारी टाळण्यासाठी प्राणी मित्रांना वन विभागच पुढे करतो का? अशा प्रकारची शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. उदासीनता झाकण्यासाठी वन विभाग असे प्रकार करतो, असा आरोप होत आहे. वन विभागाकडून जखमींकरिता ५० हजार, गंभीर जखमींना एक लाख, तर मृतासाठी आठ लाख मदतीची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे गोळा करताना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ही मदत नक्की मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचविण्यात वनविभाग धन्यता मानत आहे. सध्या नदीला मगर प्रतिबंधित संरक्षक जाळी बसविणे, सर्व्हेतून व प्रस्ताव सादर करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संमती आणि परिपत्रक काढले आहे. पण या जाळीचा उपयोगही किती होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.