शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मगरीचे बळी वाढताना वन खात्याचा कागदी खेळ

By admin | Updated: October 21, 2016 01:30 IST

प्राणीमित्रांचा अडसर : ग्रामस्थ संतप्त; सात बळी, तर चाळीसहून अधिक जखमी

सोमनाथ डवरी ल्ल कसबे डिग्रज कृष्णा नदीत औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत मगरींचा मोठा वावर आहे. यामुळे आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात सातवा बळी गेला असून, चाळीस जण जखमी झाले आहेत. तसेच कित्येक शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांचाही जीव गेला आहे. प्राणी गणनेनुसार या परिसरातीत नदीपात्रात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आहेत. वन विभाग प्रत्येक दुर्घटनेनंतर कागदी घोडे नाचवितो. प्राणीमित्रांचे कारण देतो. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, मगरींच्या हल्ल्यात अजून किती बळी जाणार, असा प्रश्न उभा आहे. आतापर्यंत अनिकेत कदम (रा. कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ सप्टेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ मार्च २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) यांचा सातवा, असे मगरबळी गेले आहेत. सुमारे ४० नागरिकांवर मगरींनी हल्ले केले आहेत. पण मोटारी सुरू करणे, वैरण काढणे, जॅकवेल परिसरातील कामे, धुणे धुणे, अंघोळीसाठी अशा विविध कारणांनी नदीवर ग्रामस्थांना जावेच लागते. औदुंबर डोह ते सांगली पुलापर्यंत वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगरींच्या गणनेत १९ मोठ्या व ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. एक मगर एका गर्भारपणात सुमारे ४०-५० पिली देते. यातील चार-पाच जरी प्रौढ झाली तरी, मगरींच्या संख्येचे भीषण वास्तव समोर येते. २००३ मध्ये अनिकेत कदमच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिने पिंजरा लावला होता आणि आता संजय भानुसे यांच्या मृत्यूनंतरही मगर पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पण मगर एकदाही सापडली नाही. त्यामुळे हा नुसताच खेळखंडोबा ठरला आहे. याचदरम्यान काही प्राणीमित्र कायद्याची भीती दाखवत मगर पकडण्यात अडसर करतात. ‘नदीवर लोकांनी जाऊ नये किंवा मगरींचा प्रतिकार करा, ठोसे लावा, डोळा फोडा, पडजीभ दाबा’ यासारखे उपाय मगरीपासून जीव वाचविण्यासाठी ते सांगतात. त्यावेळी ग्रामस्थ ही प्रात्यक्षिके करून दाखविण्याचे आवाहन करतात. काही वेळेला जबाबदारी टाळण्यासाठी प्राणी मित्रांना वन विभागच पुढे करतो का? अशा प्रकारची शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. उदासीनता झाकण्यासाठी वन विभाग असे प्रकार करतो, असा आरोप होत आहे. वन विभागाकडून जखमींकरिता ५० हजार, गंभीर जखमींना एक लाख, तर मृतासाठी आठ लाख मदतीची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे गोळा करताना त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो. त्यामुळे ही मदत नक्की मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदी घोडे नाचविण्यात वनविभाग धन्यता मानत आहे. सध्या नदीला मगर प्रतिबंधित संरक्षक जाळी बसविणे, सर्व्हेतून व प्रस्ताव सादर करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संमती आणि परिपत्रक काढले आहे. पण या जाळीचा उपयोगही किती होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.