शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

अनलाॅकवेळी व्यापारी, विक्रेत्यांना लसीची सक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गुरुवारी राज्य टास्क फोर्सचे डाॅ. सुभाष साळोखे यांनी ...

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गुरुवारी राज्य टास्क फोर्सचे डाॅ. सुभाष साळोखे यांनी महापालिकेला भेट देत स्थितीचा आढावा घेतला. अनलाॅकवेळी लस घेतलेल्या व्यापारी, फळ, भाजी विक्रेत्यांनाच प्राधान्य द्यावे, होम आयसोलेशन कमी करून कोरोना रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

गेल्या तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. साळोखे यांनी महापालिकेत बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय साळुंखे, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

साळोखे यांनी शहरात होम आयसोलेशन कमी करण्याची सूचना दिली. होम आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यासाठी कोरोना रुग्णांना संस्थांत्मक क्वारंटाईन करावे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्याची सूचना केली. कोरोना लसीबाबत नागरिकांत जनजागृती करून जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर महापालिकेने भर द्यावा. शहरातील जनरल डाॅक्टरांकडून सारी, आयएलएम व इतर आजाराच्या रुग्णांची माहिती संकलित करावी. तसेच या डाॅक्टरांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असतील तर त्याची माहितीही त्यांनी महापालिकेला देणे बंधनकारक करावे. शहरात अनलाॅक करताना मोठी खबरदारी घ्यावी. ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनाच व्यवसायाला परवानगी द्यावी आदी सूचनाही त्यांनी केल्या.

या वेळी महापालिकेच्या वतीने कोरोना काळातील अडचणीही मांडण्यात आल्या. कर्नाटकासह परजिल्ह्यातील रुग्णही सांगलीत उपचारासाठी येत आहेत. ग्रामीण भागाचाही भार महापालिकेवर आहे. त्यात आजअखेर महापालिकेला कसलाही निधी दिलेला नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचा अपेक्षित सहभाग नसल्याने प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.