शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दहा टन युरियावर पाच टन मिश्र खताची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : होलसेल रासायनिक खत विक्रेत्याला दहा टन युरिया पाहिजे असेल तर पाच टन मिश्र खते त्यांच्या माथी मारले ...

सांगली : होलसेल रासायनिक खत विक्रेत्याला दहा टन युरिया पाहिजे असेल तर पाच टन मिश्र खते त्यांच्या माथी मारले जात आहे. रासायनिक खत कंपन्यांच्या या भूमिकेमुळे खत विक्रेत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकरी युरियाबरोबर मिश्र खते घेण्यास तयार नसल्यामुळे ते खत शिल्लक राहत आहे. मिश्र खतामध्ये लाखो रुपये होलसेल विक्रेत्यांचे अडकून पडत आहेत.

सध्या ऊस, मका पिकासाठी युरियाची गरज आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात रब्बी पेरणी सुरू झाली आहे. या ठिकाणीही युरियाची मागणी वाढली आहे. युरियाची मागणी वाढताच रासायनिक खत कंपन्याकडून युरियाचा पुरवठा होत आहे. पण, युरियाबरोबरच होलसेल विक्रेत्यासच मिश्र खतांची सक्ती केली जात आहे. दहा टन युरियासाठी पाच टन मिश्र खताची सक्ती आहे. काही किलो ते दोन किलोच्या पिशवीतील महागडी ड्रीपची खतेही आहेत. या खताचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही. यामुळे शेतकरी मिश्र खते खेरिदी करत नाहीत. यामुळे होलसेल विक्रेत्याकडे मिश्र खते तशीच शिल्लक राहात आहेत. काही होलसेल विक्रेते स्वत:चा तोटा कमी करण्यासाठी युरिया घेणार असाल तर मिश्र खते तुम्हाला घ्यावीच लागतील, अशी सक्ती करत आहेत. खत कंपन्या आणि होलसेल विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराकडे कृषी विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

चौकट

खताची लिकिंग झाल्यास कारवाई : विनायक पवार

शेतकऱ्यांची गरज नसेल तर त्यांच्यावर अन्य कोणत्याही रासायनिक खताची विक्रेत्याला सक्ती करता येणार नाही. याबाबत विक्रेते, खत कंपन्या युरियावर अन्य खताची सक्तीने विक्री करत असल्यास कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. आम्ही संबंधितांवर तत्काळ कारवाई करू, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी दिला आहे.

चौकट

युरियाबरोबर मिश्र खताची सक्ती

रासायनिक खत कंपन्या युरियाबरोबर मिश्र खताची सक्ती करत आहेत. यामुळे होलसेल विक्रेते युरियाची खरेदी करत नाहीत. यामुळे जिल्ह्यात सध्या अनेक दुकानदाराकडे युरिया नाही. सध्या जो काही युरिया दिसत आहे, तो पॉसमशीनवरच दिसत आहे. यामुळे युरियाबरोबर मिश्र खताची लिकिंग करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी केली.