शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अन्न-औषध प्रशासनाचे कानावर हात!

By admin | Updated: January 6, 2015 00:47 IST

डाळिंब संकट : जिल्ह्यातील ‘अनारदाना’ कारवाईचे अधिकाऱ्यांकडून समर्थन

सांगली : जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने आणि तयार माल नाकारल्याने कित्येक क्रेट डाळिंब फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यातच डाळिंबावर प्रक्रिया केलेल्या ‘अनारदाना’ची साठवणूक करणाऱ्या दोन शीतगृहांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु छाप्याच्या कारवाईचा आणि डाळिंब रस्त्यावर फेकून देण्याचा काहीही संबंध नसल्याची भूमिका अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. उलट अयोग्य पध्दतीने ‘अनारदाना’ निर्माण केल्यास यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. ‘लोकमत’मध्ये सोमवारी ‘रोज हजारांवर क्रेट डाळिंब कचऱ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. यामध्ये अनारदाना करणाऱ्या उद्योगांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे मारून ते उद्योग बंद पाडल्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असल्याचा उल्लेख होता. याबाबत अन्न आणि औषधच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कानावर हात ठेवले. छाप्याच्या कारवाईचा आणि डाळिंब व्यावसायिकांवर आलेल्या संकटाचा काहीही संबंध नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मध्यंतरी कुपवाड एमआयडीसीमधील गोमटेश आणि दत्त कोल्ड स्टोअरेज (शीतगृह) या दोन ठिकाणी छापे टाकले होते. तेथे ठेवण्यात आलेला अनारदाना जप्त केला होता. त्यामध्ये शरीराला घातक असणाऱ्या रंगाचा अतिरिक्त वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. जप्त केलेला अनारदाना सांगोला, पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्याने शीतगृहात ठेवलेला अनारदाना निर्माण केला होता, त्याच्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाईही केली आहे. संबंधित शीतगृहचालकांना नोटीस बजावण्यात आली असून, तपासणीत गैरकारभार आढळला तर शीतगृहाचे परवाने निलंबित करण्यात येणार आहेत. अनारदाना निर्मितीस काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांनी डाळिंबे रस्त्यावर फेकण्यापेक्षा अनारदाना करण्यासाठी परजिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगांकडे पाठवावीत. त्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता त्याची नैसर्गिक स्वरूपातच विक्री केली जाईल, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अन्न आणि औषध प्रशासन, सांगली कार्यालयात अनारदानाचे उत्पादन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता परवाना घेण्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात अनारदाना प्रक्रिया उद्योग नाही. जे उद्योग आहेत, ते प्रामुख्याने सांगोला, पंढरपूर आदी ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांनी डाळिंब फेकून देण्यापेक्षा त्यावर योग्य पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी ती अनारदाना प्रक्रिया उद्योगचालकांकडे पाठवावीत व स्वत:चे आर्थिक नुकसान टाळावे.- डी. एच. कोळी. प्र. सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, सांगली.