शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:15 IST

जितेंद्र येवले । इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद ...

जितेंद्र येवले ।इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद झाली आहेत. त्यामुळे रसिकांचा हिरमोड होत आहे. बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनालाही उतरती कळा आली आहे.इस्लामपूर शहराचे वैशिष्ट्य ठरलेला उरूस कार्तिक पौर्णिमेपासून २० दिवस भरतो. तो शहराचे सांस्कृतिक संचित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उरुसानिमित्त येणारी लोकनाट्य तमाशा मंडळे बंद झाली आहेत. पूर्वी जनावरांच्या बाजारानजीकच्या ख्रिश्चन बंगला परिसरातील विस्तीर्ण आवारात ठेकेदार सिध्दू पाटील, प्रताप पाटील, पडवळे नामवंत तमाशा मंडळे रसिकांसाठी आणत. त्यामध्ये मंगला बनसोडे, काळू-बाळू, दत्ता महाडिक-पुणेकर, गुलाबराव बोरगावकर, संध्या करवडीकर या नामवंत कलाकारांच्या फडांचा समावेश असे. परंतु अलीकडील काही वर्षात गावगुंडांचा त्रास, सुरक्षेचा प्रश्न, अपुरी जागा यामुळे हा तमाशाच उरूसातून नामशेष झाला आहे. २००५ मधील उरूसावेळी तमाशांचे तंबू जवळजवळच उभारण्यात आले होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दोन तंबूंमधील कनात काढून सवाल-जवाब हा कलाप्रकार रात्रीच्या खेळावेळी सादर होत होते.बाजार समितीच्या माध्यमातून जनावरांचा बाजार भरविण्यासह स्पर्धेचेही नियोजन करण्यात येते. परंतु येथे येणाºया जनावरांची संख्या घटत चालली आहे. २0१५ मध्ये २६३0, २0१६ मध्ये २२00, २0१७ मध्ये १६00, २0१८ मध्ये १४00, २0१८ मध्ये ११८0, तर यावर्षी २0१९ मध्ये तर केवळ ६२0 जनावरे बाजारात दाखल झाली आहेत. जनावरांच्या बाजारात पुरविण्यात येणाºया सोयी-सुविधा, स्पर्धा यावरील खर्च पाहता, बाजार समितीला तोटाच सहन करावा लागत आहे. प्रत्येकवर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत आहे. यावर्षीचा खर्च ७0 हजार आणि उत्पन्न ४0 हजारांचे मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.कुस्ती मैदानही बंदउरूसानिमित्त पेठ-इस्लामपूर रोडवरील सुरेश ढाब्यासमोरील मोकळ्या जागेत कुस्ती मैदान भरवले जात होते. नामवंत मल्लांच्या कुस्त्या येथे खेळवल्या जात होत्या. परंतु हे कुस्ती मैदानही १९९० पासून बंद पडले आहे.