शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

उरूसातून लोकनाट्य तमाशा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:15 IST

जितेंद्र येवले । इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद ...

जितेंद्र येवले ।इस्लामपूर : इस्लामपुरातील संभुआप्पा-बुवाफन उरुसानिमित्त नामवंत कलाकारांची लोकनाट्य तमाशा मंडळे येत. परंतु ती दोन-तीन वर्षांपासून बंद झाली आहेत. त्यामुळे रसिकांचा हिरमोड होत आहे. बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनालाही उतरती कळा आली आहे.इस्लामपूर शहराचे वैशिष्ट्य ठरलेला उरूस कार्तिक पौर्णिमेपासून २० दिवस भरतो. तो शहराचे सांस्कृतिक संचित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उरुसानिमित्त येणारी लोकनाट्य तमाशा मंडळे बंद झाली आहेत. पूर्वी जनावरांच्या बाजारानजीकच्या ख्रिश्चन बंगला परिसरातील विस्तीर्ण आवारात ठेकेदार सिध्दू पाटील, प्रताप पाटील, पडवळे नामवंत तमाशा मंडळे रसिकांसाठी आणत. त्यामध्ये मंगला बनसोडे, काळू-बाळू, दत्ता महाडिक-पुणेकर, गुलाबराव बोरगावकर, संध्या करवडीकर या नामवंत कलाकारांच्या फडांचा समावेश असे. परंतु अलीकडील काही वर्षात गावगुंडांचा त्रास, सुरक्षेचा प्रश्न, अपुरी जागा यामुळे हा तमाशाच उरूसातून नामशेष झाला आहे. २००५ मधील उरूसावेळी तमाशांचे तंबू जवळजवळच उभारण्यात आले होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दोन तंबूंमधील कनात काढून सवाल-जवाब हा कलाप्रकार रात्रीच्या खेळावेळी सादर होत होते.बाजार समितीच्या माध्यमातून जनावरांचा बाजार भरविण्यासह स्पर्धेचेही नियोजन करण्यात येते. परंतु येथे येणाºया जनावरांची संख्या घटत चालली आहे. २0१५ मध्ये २६३0, २0१६ मध्ये २२00, २0१७ मध्ये १६00, २0१८ मध्ये १४00, २0१८ मध्ये ११८0, तर यावर्षी २0१९ मध्ये तर केवळ ६२0 जनावरे बाजारात दाखल झाली आहेत. जनावरांच्या बाजारात पुरविण्यात येणाºया सोयी-सुविधा, स्पर्धा यावरील खर्च पाहता, बाजार समितीला तोटाच सहन करावा लागत आहे. प्रत्येकवर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत आहे. यावर्षीचा खर्च ७0 हजार आणि उत्पन्न ४0 हजारांचे मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांनी स्पष्ट केले.कुस्ती मैदानही बंदउरूसानिमित्त पेठ-इस्लामपूर रोडवरील सुरेश ढाब्यासमोरील मोकळ्या जागेत कुस्ती मैदान भरवले जात होते. नामवंत मल्लांच्या कुस्त्या येथे खेळवल्या जात होत्या. परंतु हे कुस्ती मैदानही १९९० पासून बंद पडले आहे.