शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

दुष्काळी तालुक्यात १५० जनावरांसाठी चारा छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:21 IST

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर ...

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. या चार दिवसात आठ चारा छावण्यांना मंजुरी देण्याबरोबरच लहान जनावरांसाठीही आता सोय करण्यात येणार आहे.दरम्यान, शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता कमीत कमी १५० जनावरांसाठीही चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीला वळवाच्या पावसाची हजेरी ठरलेली असते. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र, वळीव पण नाही आणि मान्सूनची चाहूलही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत चारा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत निर्णय घेत, आतापर्यंत जिल्ह्यात ५० चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे.यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास संस्था उत्सुक नव्हत्या. मात्र, शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चारा छावणी सुरू करण्यास संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यामुळे आटपाडी व जत तालुक्यात आठ ठिकाणी चारा छावण्या मंजूर झाल्या आहेत. आता कमी संख्येच्याही चारा छावण्यांना मंजुरी मिळणार असल्याने छावणीत जनावरांची सोय स्थानिक पातळीवरच होणार आहे.जनावरांच्या संख्येतही शिथिलतेने दिलासायापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास कमाल ३००, तर किमान ५०० जनावरे दाखल करण्याचे आदेश होते. शासनाने या अटी शिथिल केल्या असून, आता २५० जनावरांपर्यंत ही अट आणण्यात आली होती. आता १५० जनावरांसाठीही छावण्यांना मंजुरी मिळणार आहे, तर किमान ३ हजार जनावरांपर्यंत एकाच छावणीत सोय करता येणार आहे.