शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

दुष्काळी तालुक्यात १५० जनावरांसाठी चारा छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:21 IST

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर ...

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. या चार दिवसात आठ चारा छावण्यांना मंजुरी देण्याबरोबरच लहान जनावरांसाठीही आता सोय करण्यात येणार आहे.दरम्यान, शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता कमीत कमी १५० जनावरांसाठीही चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीला वळवाच्या पावसाची हजेरी ठरलेली असते. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र, वळीव पण नाही आणि मान्सूनची चाहूलही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत चारा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत निर्णय घेत, आतापर्यंत जिल्ह्यात ५० चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे.यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास संस्था उत्सुक नव्हत्या. मात्र, शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चारा छावणी सुरू करण्यास संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यामुळे आटपाडी व जत तालुक्यात आठ ठिकाणी चारा छावण्या मंजूर झाल्या आहेत. आता कमी संख्येच्याही चारा छावण्यांना मंजुरी मिळणार असल्याने छावणीत जनावरांची सोय स्थानिक पातळीवरच होणार आहे.जनावरांच्या संख्येतही शिथिलतेने दिलासायापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास कमाल ३००, तर किमान ५०० जनावरे दाखल करण्याचे आदेश होते. शासनाने या अटी शिथिल केल्या असून, आता २५० जनावरांपर्यंत ही अट आणण्यात आली होती. आता १५० जनावरांसाठीही छावण्यांना मंजुरी मिळणार आहे, तर किमान ३ हजार जनावरांपर्यंत एकाच छावणीत सोय करता येणार आहे.