शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दुष्काळी तालुक्यात १५० जनावरांसाठी चारा छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:21 IST

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर ...

सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. या चार दिवसात आठ चारा छावण्यांना मंजुरी देण्याबरोबरच लहान जनावरांसाठीही आता सोय करण्यात येणार आहे.दरम्यान, शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता कमीत कमी १५० जनावरांसाठीही चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीला वळवाच्या पावसाची हजेरी ठरलेली असते. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र, वळीव पण नाही आणि मान्सूनची चाहूलही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत चारा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत निर्णय घेत, आतापर्यंत जिल्ह्यात ५० चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे.यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास संस्था उत्सुक नव्हत्या. मात्र, शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चारा छावणी सुरू करण्यास संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यामुळे आटपाडी व जत तालुक्यात आठ ठिकाणी चारा छावण्या मंजूर झाल्या आहेत. आता कमी संख्येच्याही चारा छावण्यांना मंजुरी मिळणार असल्याने छावणीत जनावरांची सोय स्थानिक पातळीवरच होणार आहे.जनावरांच्या संख्येतही शिथिलतेने दिलासायापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास कमाल ३००, तर किमान ५०० जनावरे दाखल करण्याचे आदेश होते. शासनाने या अटी शिथिल केल्या असून, आता २५० जनावरांपर्यंत ही अट आणण्यात आली होती. आता १५० जनावरांसाठीही छावण्यांना मंजुरी मिळणार आहे, तर किमान ३ हजार जनावरांपर्यंत एकाच छावणीत सोय करता येणार आहे.