शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समितीच्या निर्णयाकडे लक्ष : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटनाही गप्प

By admin | Updated: January 9, 2015 00:13 IST

शेतकरी संभ्रमात पडला आहे.

मांगले : चालू गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असहकार व राज्य शासनाची उदासीनता यामुळे केंद्र शासनाने साखर उताऱ्यावर ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे दर न देता सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकी करून १९०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांच्या नावावर जमा केलेली आहे. यामुळे गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीसह राज्य आणि केंद्र शासन साखर उद्योगासमोरील प्रश्नांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही, असा आरोप शेतकरीही करू लागला आहे. राज्यात कारखानदारांविरोधात तीव्र लढा उभा करून दहा वर्षांत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व त्यांचे नेते सत्तेच्या सारीपाटात गुंतून आंदोलन गुंडाळून शासनावर विश्वास ठेवून बसली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कारखाना वगळला तर, सर्वांनी एफआरपीप्रमाणे आपला दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याउलट सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी दहा वर्षांत प्रथमच एकी करून १९०० रुपये पहिली उचल गुपचुप ऊसउत्पादकांच्या नावावर बॅकांमध्ये जमा केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व त्यांचे नेते कारखानदार व शासनाला वारंवार इशारे देत तारखांची मुदत देत सुटले आहेत. मात्र याकडे ना शासनाने अगर कारखानदारांनीही लक्ष न देता आपली १९०० रुपये उचल जाहीर करून गळीत हंगाम सुरू ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. साखरदरातील अभूतपूर्व घसरणीच्या पार्श्वभूमीवर उसाला वाजवी आणि किफायतशीर दर देणे कारखान्यांना शक्य नसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेवरच यंदाचा गळीत हंगाम अवलंबून असल्याचा कारखानदारांचा दावा आहे. बिनव्याजी कर्जासारखा मदतीचा टेकू न देता बफर स्टॉक, निर्यातीसंबधी निर्णय घेता येऊ शकतात, शिवाय साखर निर्यातीला अनुदान व साखर उद्योगासाठी पॅकेज दिल्यास यावर्षी ऊस उत्पादकांना समाधानकारक दर देता येईल, त्यासाठी राज्य व केंद्र शासनानेच पुढाकार घेऊन ऊसउत्पादक व कारखानदार यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी कारखानदारांची आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची एकी व स्वाभिमानीची आंदोलनाची बेकी यामुळे शेतकरी मात्र हादरला आहे. साखर कारखानदार दुसरा हप्ता देणार का? आणि तो कितीचा असणार अशीही शेतकऱ्यांत चर्चा आहे. (वार्ताहर)वारणाचे प्रतिटन २००० रुपयेप्रमाणे जमासांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे दोन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यानेही नोव्हेंबरअखेर गळितास आलेल्या उसास प्रतिटन २००० प्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर बॅँकांत जमा केले आहेत.