शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

समितीच्या निर्णयाकडे लक्ष : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटनाही गप्प

By admin | Updated: January 9, 2015 00:13 IST

शेतकरी संभ्रमात पडला आहे.

मांगले : चालू गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असहकार व राज्य शासनाची उदासीनता यामुळे केंद्र शासनाने साखर उताऱ्यावर ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणे दर न देता सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकी करून १९०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांच्या नावावर जमा केलेली आहे. यामुळे गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीसह राज्य आणि केंद्र शासन साखर उद्योगासमोरील प्रश्नांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही, असा आरोप शेतकरीही करू लागला आहे. राज्यात कारखानदारांविरोधात तीव्र लढा उभा करून दहा वर्षांत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व त्यांचे नेते सत्तेच्या सारीपाटात गुंतून आंदोलन गुंडाळून शासनावर विश्वास ठेवून बसली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कारखाना वगळला तर, सर्वांनी एफआरपीप्रमाणे आपला दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याउलट सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी दहा वर्षांत प्रथमच एकी करून १९०० रुपये पहिली उचल गुपचुप ऊसउत्पादकांच्या नावावर बॅकांमध्ये जमा केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व त्यांचे नेते कारखानदार व शासनाला वारंवार इशारे देत तारखांची मुदत देत सुटले आहेत. मात्र याकडे ना शासनाने अगर कारखानदारांनीही लक्ष न देता आपली १९०० रुपये उचल जाहीर करून गळीत हंगाम सुरू ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. साखरदरातील अभूतपूर्व घसरणीच्या पार्श्वभूमीवर उसाला वाजवी आणि किफायतशीर दर देणे कारखान्यांना शक्य नसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेवरच यंदाचा गळीत हंगाम अवलंबून असल्याचा कारखानदारांचा दावा आहे. बिनव्याजी कर्जासारखा मदतीचा टेकू न देता बफर स्टॉक, निर्यातीसंबधी निर्णय घेता येऊ शकतात, शिवाय साखर निर्यातीला अनुदान व साखर उद्योगासाठी पॅकेज दिल्यास यावर्षी ऊस उत्पादकांना समाधानकारक दर देता येईल, त्यासाठी राज्य व केंद्र शासनानेच पुढाकार घेऊन ऊसउत्पादक व कारखानदार यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी कारखानदारांची आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची एकी व स्वाभिमानीची आंदोलनाची बेकी यामुळे शेतकरी मात्र हादरला आहे. साखर कारखानदार दुसरा हप्ता देणार का? आणि तो कितीचा असणार अशीही शेतकऱ्यांत चर्चा आहे. (वार्ताहर)वारणाचे प्रतिटन २००० रुपयेप्रमाणे जमासांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे दोन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यानेही नोव्हेंबरअखेर गळितास आलेल्या उसास प्रतिटन २००० प्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर बॅँकांत जमा केले आहेत.