शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तीळगंगा ओढ्याच्या पुराने रेठरे धरण परिसरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने ...

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने शेती, पिके व रस्त्यांच्या भरावाचे मोठे नुकसान झाले. गावातील सुमारे वीस घरांत पुराचे पाणी शिरले.

बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच रेठरे धरण व मरळनाथपूरच्या डोंगर परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तीळगंगा ओढ्याचे पात्र मोठ्याप्रमाणात विस्तारले. परिणामी बाजूच्या शेतातील ऊस व अन्य पिकामध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. रेठरे धरण ते शिराळा मार्गावरील नवीन गावपुलावरून पहिल्यांदाच पाणी वाहिले. रेठरे धरण ते पेठ रस्त्यावरील लेंडुरी पूल, रेठरे धरण-माणिकवाडी रस्त्यावरील रामलिंग पुलावर सायंकाळी पाणी आले होते. यावेळी काहीकाळ वाहतूक बंद होती.

लेंडुरी पुलावरून पाणी वाहिल्याने पूल व रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. येथील रामोशी समाजाच्या घरात पाणी शिरले होते. गावातील मध्यवर्ती बँकेजवळील सुमारे दहा ते पंधरा घरांत पाणी शिरले. बागरान परिसरात जाणारा पूल पुराच्या पाण्यामुळे तुटून गेला. येथील शेतकरी संतोष महिंद यांचे सुमारे पंधरा गुंठे शेत तुटून गेले आहे, मानाजी धुमाळ, निवृत्ती धुमाळ, विश्वास धुमाळ यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. ओढ्यालगतचे लोखंडी पोल पावसामुळे वाहून गेले आहेत. प्रभाग चारमधील ओढ्यालगत असणारी स्मशानभूमी कोसळली. अनेक शेतकऱ्यांच्या गंज्या वाहून गेल्या आहेत.