शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

तीळगंगा ओढ्याच्या पुराने रेठरे धरण परिसरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने ...

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीळगंगा ओढ्याला पूर आल्याने शेती, पिके व रस्त्यांच्या भरावाचे मोठे नुकसान झाले. गावातील सुमारे वीस घरांत पुराचे पाणी शिरले.

बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच रेठरे धरण व मरळनाथपूरच्या डोंगर परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तीळगंगा ओढ्याचे पात्र मोठ्याप्रमाणात विस्तारले. परिणामी बाजूच्या शेतातील ऊस व अन्य पिकामध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. रेठरे धरण ते शिराळा मार्गावरील नवीन गावपुलावरून पहिल्यांदाच पाणी वाहिले. रेठरे धरण ते पेठ रस्त्यावरील लेंडुरी पूल, रेठरे धरण-माणिकवाडी रस्त्यावरील रामलिंग पुलावर सायंकाळी पाणी आले होते. यावेळी काहीकाळ वाहतूक बंद होती.

लेंडुरी पुलावरून पाणी वाहिल्याने पूल व रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. येथील रामोशी समाजाच्या घरात पाणी शिरले होते. गावातील मध्यवर्ती बँकेजवळील सुमारे दहा ते पंधरा घरांत पाणी शिरले. बागरान परिसरात जाणारा पूल पुराच्या पाण्यामुळे तुटून गेला. येथील शेतकरी संतोष महिंद यांचे सुमारे पंधरा गुंठे शेत तुटून गेले आहे, मानाजी धुमाळ, निवृत्ती धुमाळ, विश्वास धुमाळ यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. ओढ्यालगतचे लोखंडी पोल पावसामुळे वाहून गेले आहेत. प्रभाग चारमधील ओढ्यालगत असणारी स्मशानभूमी कोसळली. अनेक शेतकऱ्यांच्या गंज्या वाहून गेल्या आहेत.