शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

चार महिन्यांत पाचवेळा पंचनाम्याची वेळ

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

अवकाळीने नुकसान : रविवारी पहाटेपर्यंत पावसाचा मुक्काम, पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त

सांगली : अवकाळी पावसाने खेळ मांडल्याने शेतकरी, बागायतदारांचे गेल्या चार महिन्यांपासून हाल सुरू आहेत. प्रशासकीय पातळीवरही एक पंचनामा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या पंचनाम्याची तयारी करावी लागत आहे. गेल्या चार महिन्यांत पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले. यापैकी एका पंचनाम्यातील नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाला पाचव्यांदा फेरपंचनाम्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, दिवसभर उकाडा राहिल्याने बेदाणा, द्राक्ष, डाळिंब बागायतदारांमध्ये धडकी कायम आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांमध्ये रात्री तुरळक पावसाने हजेरी लावली. शनिवारी खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांदा अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, त्यानंतर मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)चार कोटी रुपये नुकसानभरपाईमार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्णत्वास आले होते. असे असतानाच दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच तालुक्यात पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी दिली. पहिल्या आठवड्यातील पावसाचे सुमारे आठ हजार पाचशे हेक्टरवरील शेतीपिकाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जादा २ हजार २२६, तर ३ हजार ९१२ हेक्टरवर ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. डिसेंबरअखेर झालेल्या अवकाळीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून चार कोटी रुपये आले आहेत. याचे वितरणही सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. आळसंदमध्ये रासायनिक खताचे ६ लाखांचे नुकसानआळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे काल शनिवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. आळसंद येथील माजी सरपंच प्रकाश यशवंत जाधव यांच्या मालकीचे यशवंत कृषी केंद्राच्या रासायनिक खताच्या गोडावूनचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने खतांची सर्वच्या सर्व पोती भिजली. त्यामुळे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक घरांवरील कौले व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.