शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पाच विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

आटपाडीतील प्रकार : समाजकल्याण अधिकारी, ठेकेदारांचे लागेबांधे

अविनाश बाड - आटपाडी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाचे ठेकेदार आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेले लागेबांधे उघड झाले आहेत. जेवणाच्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार केल्याने आटपाडीच्या वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर काढून टाकण्याचा प्रताप या विभागाने केला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, या पाच विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावरून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तोंडातील घासावर ठेकेदारासह अधिकारीही डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागातर्फे मुलांसाठी आणि मुलींसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करून आणि आंदोलनाचा इशारा देऊनही परिस्थितीत कायमस्वरूपी सुधारणा होत नसल्याने वसतिगृहातील ठेकेदार आणि कर्मचारी वादग्रस्त ठरले आहेत.या वसतिगृहात वेळेवर आणि नियमाप्रमाणे जेवण मिळत नाही. निकृष्ट दर्जाची फळे दिली जातात. विद्यार्थ्यांना पुरेसे जेवण मिळत नाही. जेवणाचे चव रजिस्टर ठेवले जात नाही. त्यावर रोजच्या रोज विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या जात नाहीत. महिन्यातून एकदा सह्या घेतल्या जातात. ३ फेबु्रवारी २०१५ रोजी रात्रीच्या जेवणात निकृष्ट बासुंदी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुर्गंधी येत असलेली बासुंदी खाण्यास नकार दिला. कारण त्याच कंपनीचे श्रीखंड दि. ३० जानेवारी रोजी खाल्ल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. त्यासंबंधी तक्रार घेण्यासाठी अधीक्षक एस. एस. थोरात वसतिगृहात नव्हते, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. दि. ३ फेबु्रवारी रोजी बासुंदीबाबत तक्रार करण्यासाठीही गेले असता, अधीक्षक नव्हते. म्हणून भ्रमणध्वनीवरून विद्यार्थ्यांनी अधीक्षक थोरात यांना तक्रार सांगितली. अशी तक्रार करणाऱ्या नेताजी धनाजी भिसे (बी. कॉम. भाग ३), रोहित नामदेव कांबळे (बी. एस्सी भाग ३), ललित लक्ष्मण केंगार (दहावी), अंकुश यशवंत माळी (बारावी) आणि किरण मोहन चंदनशिवे (बारावी) या पाच विद्यार्थ्यांविरोधात भोजन ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला तक्रार अर्ज करायला लावून त्याआधारे या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातील प्रवेश बेशिस्त वर्तनाखाली रद्द करण्यात आला. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ७१ विद्यार्थ्यांनी, ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला. मानवता फौंडेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार मोटे, नंदकुमार कदम आणि महेश काटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीला जाऊन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त दीपक घाटे यांची भेट घेतली व आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले. तसा लेखी आदेश घेऊनच कार्यकर्त्यांनी आटपाडी गाठली.