शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

आटपाडीतील प्रकार : समाजकल्याण अधिकारी, ठेकेदारांचे लागेबांधे

अविनाश बाड - आटपाडी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाचे ठेकेदार आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेले लागेबांधे उघड झाले आहेत. जेवणाच्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार केल्याने आटपाडीच्या वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर काढून टाकण्याचा प्रताप या विभागाने केला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, या पाच विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावरून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तोंडातील घासावर ठेकेदारासह अधिकारीही डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागातर्फे मुलांसाठी आणि मुलींसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करून आणि आंदोलनाचा इशारा देऊनही परिस्थितीत कायमस्वरूपी सुधारणा होत नसल्याने वसतिगृहातील ठेकेदार आणि कर्मचारी वादग्रस्त ठरले आहेत.या वसतिगृहात वेळेवर आणि नियमाप्रमाणे जेवण मिळत नाही. निकृष्ट दर्जाची फळे दिली जातात. विद्यार्थ्यांना पुरेसे जेवण मिळत नाही. जेवणाचे चव रजिस्टर ठेवले जात नाही. त्यावर रोजच्या रोज विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या जात नाहीत. महिन्यातून एकदा सह्या घेतल्या जातात. ३ फेबु्रवारी २०१५ रोजी रात्रीच्या जेवणात निकृष्ट बासुंदी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुर्गंधी येत असलेली बासुंदी खाण्यास नकार दिला. कारण त्याच कंपनीचे श्रीखंड दि. ३० जानेवारी रोजी खाल्ल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. त्यासंबंधी तक्रार घेण्यासाठी अधीक्षक एस. एस. थोरात वसतिगृहात नव्हते, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. दि. ३ फेबु्रवारी रोजी बासुंदीबाबत तक्रार करण्यासाठीही गेले असता, अधीक्षक नव्हते. म्हणून भ्रमणध्वनीवरून विद्यार्थ्यांनी अधीक्षक थोरात यांना तक्रार सांगितली. अशी तक्रार करणाऱ्या नेताजी धनाजी भिसे (बी. कॉम. भाग ३), रोहित नामदेव कांबळे (बी. एस्सी भाग ३), ललित लक्ष्मण केंगार (दहावी), अंकुश यशवंत माळी (बारावी) आणि किरण मोहन चंदनशिवे (बारावी) या पाच विद्यार्थ्यांविरोधात भोजन ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला तक्रार अर्ज करायला लावून त्याआधारे या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातील प्रवेश बेशिस्त वर्तनाखाली रद्द करण्यात आला. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ७१ विद्यार्थ्यांनी, ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला. मानवता फौंडेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार मोटे, नंदकुमार कदम आणि महेश काटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीला जाऊन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त दीपक घाटे यांची भेट घेतली व आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले. तसा लेखी आदेश घेऊनच कार्यकर्त्यांनी आटपाडी गाठली.