शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पाच विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

आटपाडीतील प्रकार : समाजकल्याण अधिकारी, ठेकेदारांचे लागेबांधे

अविनाश बाड - आटपाडी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाचे ठेकेदार आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेले लागेबांधे उघड झाले आहेत. जेवणाच्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार केल्याने आटपाडीच्या वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर काढून टाकण्याचा प्रताप या विभागाने केला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, या पाच विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावरून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तोंडातील घासावर ठेकेदारासह अधिकारीही डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागातर्फे मुलांसाठी आणि मुलींसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करून आणि आंदोलनाचा इशारा देऊनही परिस्थितीत कायमस्वरूपी सुधारणा होत नसल्याने वसतिगृहातील ठेकेदार आणि कर्मचारी वादग्रस्त ठरले आहेत.या वसतिगृहात वेळेवर आणि नियमाप्रमाणे जेवण मिळत नाही. निकृष्ट दर्जाची फळे दिली जातात. विद्यार्थ्यांना पुरेसे जेवण मिळत नाही. जेवणाचे चव रजिस्टर ठेवले जात नाही. त्यावर रोजच्या रोज विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या जात नाहीत. महिन्यातून एकदा सह्या घेतल्या जातात. ३ फेबु्रवारी २०१५ रोजी रात्रीच्या जेवणात निकृष्ट बासुंदी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुर्गंधी येत असलेली बासुंदी खाण्यास नकार दिला. कारण त्याच कंपनीचे श्रीखंड दि. ३० जानेवारी रोजी खाल्ल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. त्यासंबंधी तक्रार घेण्यासाठी अधीक्षक एस. एस. थोरात वसतिगृहात नव्हते, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. दि. ३ फेबु्रवारी रोजी बासुंदीबाबत तक्रार करण्यासाठीही गेले असता, अधीक्षक नव्हते. म्हणून भ्रमणध्वनीवरून विद्यार्थ्यांनी अधीक्षक थोरात यांना तक्रार सांगितली. अशी तक्रार करणाऱ्या नेताजी धनाजी भिसे (बी. कॉम. भाग ३), रोहित नामदेव कांबळे (बी. एस्सी भाग ३), ललित लक्ष्मण केंगार (दहावी), अंकुश यशवंत माळी (बारावी) आणि किरण मोहन चंदनशिवे (बारावी) या पाच विद्यार्थ्यांविरोधात भोजन ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला तक्रार अर्ज करायला लावून त्याआधारे या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातील प्रवेश बेशिस्त वर्तनाखाली रद्द करण्यात आला. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ७१ विद्यार्थ्यांनी, ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला. मानवता फौंडेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार मोटे, नंदकुमार कदम आणि महेश काटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीला जाऊन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त दीपक घाटे यांची भेट घेतली व आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले. तसा लेखी आदेश घेऊनच कार्यकर्त्यांनी आटपाडी गाठली.