शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

राज्यातील पाच टक्के अधिकारी वाया गेलेले

By admin | Updated: October 13, 2015 23:48 IST

ग. दि. कुलथे : भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी नाही

सांगली : राज्यातील ८० टक्के राजपत्रित अधिकारी आपला खर्च पगारात भागवितात, तर पाच टक्के अधिकारी वाया गेले असून, त्यांच्यात सुधारणा अशक्य असल्याचे मत राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली. महासंघाच्यावतीने भ्रष्टाचारमुक्त शासन व प्रशासनासाठी ‘पगारात भागवा’ अभियान हाती घेतले आहे. यानिमित्ताने कुलथे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेतली. पत्रकारांशी बोलताना कुलथे म्हणाले की, सध्या शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणात रंगेहात पकडले जात आहेत. त्यामुळे सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, अशी प्रतिमा निर्माण होत आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी ‘पगारात भागवा’ हे अभियान हाती घेतले आहे. राज्यातील ८० टक्के अधिकारी पगारावर खर्च भागवितात, तर २० टक्के अधिकारी भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यापैकी १५ टक्के अधिकाऱ्यांत सुधारणा करणे शक्य आहे. उर्वरित पाच टक्के अधिकारी पूर्णपणे वाया गेलेले आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे अधिकारी भ्रष्टाचारात सापडतील, त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटले दाखल करण्याची मागणी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आहे. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद झाली पाहिजे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना महासंघात स्थान दिले जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांसाठी शासनाकडे महासंघाच्यावतीने शिफारस करून त्यांना पाठीशीही घातले जाणार नसल्याचे कुलथे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तीन पिढ्या बदनामएखादा अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचारात सापडला, तर त्याच्या तीन पिढ्या बदनाम होतात. त्याच्या आई-वडिलांना मुलांच्या कर्तृत्वाची शिक्षा मिळते, तर अधिकाऱ्याच्या मुलांनाही सार्वजनिक जीवनात वावरताना टोमणे सहन करावे लागतात. अधिकाऱ्याच्या पत्नीलाही चारचौघात अपमानित व्हावे लागते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी कितीही पैसा ओतला तरी उपयोग होत नाही, असेही कुलथे म्हणाले.