शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात ‘देशी केळी’तून पाच लाखाचे उत्पन्न

By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST

पद्माळेच्या धडपड्या शेतकऱ्याचा प्रयोग; महिन्याला तब्बल दहा टन उत्पादनाचे उद्दिष्ट

सांगलीजवळच्या कृष्णा नदीकाठच्या गावांत मुबलक पाण्यामुळे शेतकरी ऊसपीक घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला पर्याय म्हणून विनोद बाबूराव चौगुले (रा. पद्माळे, ता. मिरज) या तरूण शेतकऱ्याने देशी केळीचे पीक घेण्याचा वेगळा प्रयोग केला आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी सुनियोजित प्रयत्न तो करत आहे. बाजारात ग्राहकांना महिन्याला दहा टन देशी केळी उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे. पद्माळे या कृष्णाकाठावर असणाऱ्या गावात ऊस पिकाचे क्षेत्र मोठे आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी नदीच्या कडेला मळीभागात केळीच्या बागा काही प्रमाणात होत्या, पण नंतर त्यांचे रूपांतर ऊस पट्ट्यात झाले. विनोद चौगुले यांची दहा एकर शेती आहे. यापूर्वी त्यांनी हळद, मूग, उडीद ही पिके घेतली होती. कमीत कमी कालावधित उत्तम पिके घेण्याबरोबरच त्यांनी जमिनीचा पोत सुधारत विक्रमी उत्पन्न घेतले आहे. वेगळे प्रयोग करण्याकडे कल असणाऱ्या विनोद यांनी ऊस पिकाला फाटा देत शेतात देशी केळी घेण्याचे ठरवले, त्यासाठी अभ्यासही सुरू केला. आधुनिक पध्दतीने त्याची लागवड सुरू केली. पहिल्या टप्प्यात अडीच एकर क्षेत्र यासाठी निवडले. लागवडीयोग्य जमीन, पाट पाणी पध्दत करीत निपाणी येथून देशी केळीची राजापुरी जातीची टिश्यु कल्चर रोपे (प्रतिरोप वीस रुपये) आणली. सहा फूट बाय सहा अंतरावर एकूण ३२०० रोपांची लागण २९ जून ते १ जुलै २०१५ दरम्यान केली. यासाठी मौजे डिग्रजचे दीपक फराटे यांनी मार्गदर्शन केले. मात्र गत उन्हाळ्यात दोनशे रोपे खराब झाली. त्या ठिकाणी पुन्हा नवीन लागवड झाली. सेंद्रीय खताबरोबरच रासायनिक खते, कीटकनाशकांचा योग्य वापर, औषध फवारणी यामुळे पीक निरोगी आले. महिन्याला गोमूत्र डोस व अतिरिक्त केळी पिकाची (पिले) छाटणी, यामुळे १ जानेवारीपासून केळीचे घड पडणे सुरू झाले. सरासरी नऊ किलोचा घड ठेवण्यात आला. लागवडीनंतर चौदा महिन्यांनी दुसरे घड पडण्यास सुरूवात झाली. कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांनी बागेची पाहणी करून टनाला सरासरी पंचवीस हजार दर निश्चित केला. विशेष म्हणजे, त्यावेळी बाजारात प्रत्यक्ष दर कमी होता, तरीही मालाचा दर्जा पाहून अधिक दर दिला. आता दुसऱ्यांकडून ३० ते ३५ हजार दर देण्याची बोली होत असूनही, त्याच व्यापाऱ्यास चौगुले माल देत आहेत. त्यांना २४ ते २५ टन पीक अपेक्षित होते, पण एकरी सरासरी नऊ टन केळी मिळतील असे वाटते. काळी माती व पाट पाणी पध्दत त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होते. आजअखेर त्यांना तीन लाख रू पये खर्च आला आहे, तर उत्पन्न पाच लाखाचे मिळाले आहे. शेतात ते स्वत: राबतात. १ जुलै २०१६ ला त्यांनी आणखी दोन एकर शेतीत देशी केळीबाग केली असून त्यासाठी रोपे शेतातीलच वापरली आहेत. १ नोव्हेंबर २०१६ ला आणखी केळीबाग करण्याचा त्यांचा इरादा आहे. तीन टप्प्यात बाग असल्याने भविष्यात आठवड्यास दोन टन देशी केळी बाजारात पाठवता येतील, असे त्यांना वाटते. नदीकाठच्या परिसरात अतिरिक्त पाण्यामुळे शेती काही प्रमाणात खराब होत आहे. त्यातच काळी माती असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. केळी पिकासाठी ही स्थिती अडचणीची होती. - गजानन साळुंखे